मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

आदर्श कोणाचा..

सध्या आदर्श सोसायटी प्रकरण सगळ्या वाहिन्यांवर अगदी breaking news म्हणून झळकत आहे.. त्यात हळू हळू एकेका मत्र्यांच्या नावांची भर पडून राजकारणाचं पितळ उघडं पडत आहे .. हे तर एक उदाहरण आहे .. अशा कितीतरी बातम्या येतात आणि जातात , त्याचं पुढे काहीही होत नाही .. खरंतर मला politics मध्ये बिलकुल रस नाहीये .. पण अशा प्रकारच्या बातम्या ऐकल्यावर नेहमीच वाटतं कि हे सगळे राजकारणातले लोकं एका माळेचे मणी कसे काय आहेत .. इथून तिथून तशीच लोकं , मग पक्ष कोणताही असो .. छोट्या छोट्या कार्यालयापासून देशाच्या पातळीपर्यंत अगदी सगळीकडे गच्च भरलेले 'curruption'.. आपण लहानपणी गोष्टी ऐकायचो त्यात ' शिवाजी महाराज , स्वातंत्रवीर सावरकर , साने गुरुजी , स्वामी विवेकानंद ' असे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आदर्श व्यक्तींच्या कथा असायच्या .. पण आपण आपल्या पुढच्या पिढीसमोर कोणाचे आदर्श ठेवणार आहोत ? साधा सरळ माणूस सध्या मागो पडतोय आणि political view असलेला माणूस स्पर्धेत टिकून राहतोय.. मोठ्या लोकांचं सोडा पण काहीजण नात्यात,मैत्रीत राजकारण खेळतातना तेव्हा मनाची खरच घालमेल होते.. आजकाल चुकीच्या मार्गाने जाणार्या लोकांवर कोणाचाच अंकुश राहिला नाहीये,जो ज्याला मनात येईल तसं वागतो.. तर मग हे असा किती दिवस चालणार ? पूर्वीच्या काळात कितीतरी थोर संत आणि पराक्रमी व्यक्ती होऊन गेले मग या आताच्या युगात अशी एकपण व्यक्ती का बरं नाही ? आणि जर असेल तर त्यांचा सहवास सर्व सामान्य लोकांना कसा आणि कधी लाभणार?

अशावेळेस गीतेचा हा प्रसिद्ध श्लोक राहून राहून आठवतो..


यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भावतिभारत
अभ्युत्थानंहि अधर्मस्य
तदात्मानंसृजाम्यहम

Meaning- Whenever and where ever there is decline and decay of righteousness,O Bharatha, then I (Lord Vishnu)manifest myself. In all such dark periods of history, some great master comes to present himself as the leader of men to revive the standard of life and moral values.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: