मंगळवार, २८ डिसेंबर, २०१०

मंतरलेले दिवस - १०

त्या  दिवशी  उशीर  झाला  होता.. office नंतर  बाहेरचं  काम  आटपून  बालगंधर्व  जवळ बसची  वाट  बघत  थांबले  होते.. रात्रीचे  ८.३०  वाजलेतरी  बस  गच्च  भरून  जात  होत्या.. पूर्वी  लाल  डब्ब्याने  बराच  प्रवास  केल्याने  गर्दीत  घुसून  जागा  मिळवायचं  कौशल्य  मला  चांगलं  अवगत  आहे.. भरलेल्या  बसमध्ये  बसायला  जागा  मिळण्याचं  सुख  काय  असतं  ते  रोजच्या  प्रवाश्यांना नेमकं  समजू  शकेल.. असो.. तर  बस  धावत  होती.. थंड  हवा  वहात  होती  आणि  सोबत  मी  गाणी  ऐकत  होते.. नाही  नाही , romantic असं  काहीच  घडलं  नाही  तेव्हा.. :P
त्या  गर्दीत  एक  वयस्कर  माणूस  उभा  होता.. नीट  बघितल्यावर  कळलं  त्याचा  तोल  जात  होता  आणि  तो  वेग  कमीजास्त होईल  तसा  इकडे  तिकडे  पडत  होता.. त्या  माणसाला  कसलीच  शुद्ध  नव्हती.. आणि  लोक  त्याच्याकडे  बघून  हसत  होते.. न  राहवून  मी  त्या  माणसाला  बसायला  जागा  दिली.. लगेचच  शेजारचा  माणूस  मला  म्हणला  तो  पिलेला  आहे  त्याला  कशाला  जागा  दिली? आणि  मग  बाकीचे  लोक  त्याच्याकडे  बघून  अजूनच  हसायला  लागले..
मला  माहिती  होता  खरतर ,दारूचा  एक विशिष्ठ  वास  येतच  होता.. आणि  मला  स्वतःला  दारू व  दारू  पिणाऱ्याबद्दल   अतिशय  चीड  आणि  तिरस्कार  वाटतो.. पण  माणसाची  परिस्थिती  खूप  वेगळी  वाटली.. बाबांच्या  वयाएव्हडा  वयस्कर  माणूस  होता,कपड्यांवरून  साधा  वाटत  होता.. म्हणजे  तरुण  आहे  म्हणून  किवा  पैसे  आहेत  म्हणून  उधळण्यासाठी  दारू  घेतली  नसावी  त्याने असं मला वाटलं..
काहीतरी  वेगळं  कारण  असेल  असं  उगाच  विचार आला  आणि  कसातरी  झालं.. आणि  समजा  त्याने  व्यसनापोटी  दारू  घेतली  असली  तरी  त्याला  हसायचा  का? असं केल्याने तो माणूस अजूनच चुकीच्या मार्गावर जाण्याची जास्त शक्यता  असते.. खरतर  अशावेळेस  कोणाचातरी  आधार  हवा  असतोना ? पण अशा वेळी  सगळे हात वर करतात.. मनुष्यावर  कधी  कुठली  परिस्थिती  ओढवेल  कोणालाच  सांगता  येत  नाही.. मग  दुसर्यांच्या  दुखावर,वाईट  गोष्टींवर ,कमतरतेवर ,अपयशावर  किवा  चुकावर  आपण  का  हसावं? एकतर  मदत  करावी  आणि  ते  जमत  नसेल  तर  गप्प  बसावं, नाही  का?

मंगळवार, २१ डिसेंबर, २०१०

मनाच्या रांगोळित..

मनाच्या रांगोळित.. रंग तुझे भरते..
अन् रंगात तुझ्या मी.. चिंब चिंब भिजते..

मनाच्या समईत.. ज्योत तुझी पेटवते..
अन् ज्योतीत तुझ्या मी.. लख्ख लख्ख उजळते.

मनाच्या अंगणात.. वेल तुझा लावते..
अन् वेलीत तुझ्या मी.. गच्च गच्च बहरते..

मनाच्या शृंगारात.. रत्न तुझे चढवते..
अन् रत्नात  तुझ्या मी.. दिव्य दिव्य सजते..

मनाच्या मंदिरात.. नाम तुझे चिंतते..
अन् नामात तुझ्या मी..  कोटी कोटी वन्दिते..

मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०

प्रेम तर सगळेच करतात..

काहीजण देतात.. काहीजण घेतात.. प्रेमात तर सारे पडतात..
हेही करतात..  अन तेही करतात.. प्रेम तर सगळेच करतात..

कोणी घरावर..  कोणी जगावर..
पण प्रेम तर सगळेच करतात..

कोणी  मोजूनमापून.. कोणी  भरभरून..
अहो प्रेम तर सगळेच करतात..

कोणी लपूनछपून.. कोणी मुक्तपणे..
मात्र प्रेम तर सगळेच करतात..

कोणी हेतुपुरस्त..   कोणी  निरपेक्ष..
तरी प्रेम तर सगळेच करतात..

कोणी डोळसपणे..  कोणी डोळेमिटून..
नक्की प्रेम तर सगळेच करतात..

काहीजण  प्रेम  शिकतात..  काहीजण प्रेम शिकवतात..
असो प्रेम तर सगळेच करतात..

सोमवार, १३ डिसेंबर, २०१०

तळं मनातलं..

उगवतीला  तांबडं  फुटतं..   अन तळं  लालसर  दिसतं..
दुपारचं  उन्ह  चढतं..   तसं ते सोनेरी  भासतं..

आकाश  निरभ्र  होतं..   अन तळं  निळाशार  दिसतं..
धुकं  दाटून  येतं..   तसं ते अस्पष्ट  भासतं..

जग  काळोखात  बुडतं..   अन तळं  सावळंसं  दिसतं..
चांदणं  फुलून  येतं..   तसं ते चंदेरी  भासतं..

मातीचं रूप  बदलतं..    अन तळं  मातकट  दिसतं..
ओंजळीत जितकं  येतं..   तसं ते रन्गहिन  भासतं..

ज्याचा जसा घडे संग..   तसा तळ्याचा होई रंग..
विचारात होई जेव्हा दंग..   ते तळं भासे मनापरी धुंद..

गुरुवार, ९ डिसेंबर, २०१०

मंतरलेले दिवस - ९

Answered Prayers..


गेल्या  काही  दिवसांपासून मी  'श्रीकृष्ण  पूर्ण  पुरषोत्तम  भगवान' वाचत  आहे.. त्यामध्ये  छोट्या छोट्या  कथांमधून  अध्यात्म  खूप  सुंदरपणे  सांगितलं  आहे.. नेहमीसारखच  काळ  रात्री  झोपताना  ती  कादंबरी  वाचायला  घेतली आणि.. आणि  जीवनातलं  एक  रहस्य  उलगडलं.. :)
आपण  नेहमीच  ऐकतो  कि  या  सृष्टीचा  निर्माता,पालनकर्ता  आणि  संहारकर्ता  'तो' आहे.. सर्व  कारणांचे  कारण  तोच  आहे.. आपण  जन्माला  येतानाच त्याने   आपल्या   जीवनाचे  अध्याय लिहून  ठेवलेले  असतात.. आपल्या  हातून  जे  काही  घडते  त्यामागची  प्रेरणा  आपल्याला  परमेश्वर  तथा  परमात्म्याकडून  मिळत  असते.. 

बर हे  असं  सगळं  आहे  तर  मग  कधी  कधी  माणूस  दुखी  का  होतो? कितीही  प्रार्थना  केलीतरी  प्रत्येक  माणसाला  कधीना  कधी  संकटांचा  तडाखा  का  बसतो? याला  एक  कारण  असं असू  शकतं  कि  आपली  गतजन्माची  कृत्ये.. पण  मग  देव  आपल्या  हातून  असे कर्म  का  घडवून  आणतो  कि  ज्याने  आपणास  खूप  दुख  होतं,त्रास  होतो? असे  प्रश्न  मला  नेहमीच  पडतात! (दिल  तो  बच्चा  है  जी)
काल  मला  या  प्रश्नाचं  उत्तर  मिळालं.. आणि  अगदी  मनोमनी  पटलं.. :)  
"दुखाची  दरी  ओलांडल्याशिवाय  सुखाची  हिरवळ  दिसत  नाही!!!"
सर्वसाधारणपणे  माणूस  देवाची  प्रार्थना करतो  ते  भौतिक  गोष्टी  मागण्यासाठी.. अगदी  लहानपणीपासून  सुरुवात  होते  पहा.. देवा  मला  परीक्षेत  चांगले  गुण  मिळूदे.. मला  चांगली  नोकरी  मिळूदे..  माझं  स्वतःच  घर/गाडी  होऊदे.. देवा  मला  चांगला  जोडीदार  मिळूदे.. माझी तब्येत चांगली ठेव.. इत्यादी.. इथेच  गोचा  होतो..  सगळे  ग्रंथ  हेच  सांगतात  कि  मानवी  जीवनाचा  खरा  हेतू  पैसे  मिळवणे/लग्न/मुलबाळ  होणे   हा  नाहीये.. परमेश्वराला  ओळखणं आणि मी  कोण आहे याचा शोध घेणं  हा  खरा  उद्देश  आहे.. अर्थात  त्यासाठी  संसार  सोडून  सन्यास  घेतला  पाहिजे  असं  काही  नाहीये.. तर  नित्य कर्म  करता  करता  देवाची  शुद्ध  भक्ती  करावी  असं  अभिप्रेत  असतं..  म्हणून  देव  आपल्या  भक्तांना  कधी  कधी  भयंकर  प्रतिकूल  परिस्थितीत  टाकतो  कि  जेणेकरून  आपल्या  मनात  शुद्ध  भक्तीभाव  निर्माण  व्हावा.. तो  मुद्दाउन  एका  क्षणी  सुखाची  सावली  अन  दुसऱ्या  क्षणी  दुखाची  झळ  देतो  त्यामुळे  भक्ताच्या  मनातून  मायावादी  भौतिक  गोष्टींची  आसक्ती  कमी  होऊ  लागते..  त्या  वेळेस  भक्ताला  जाणीव  होते  कि  आपण  जे  आपलं  म्हणून  मिरवत  आहे  ते  काही  आपलं  नाहीये  आणि  ओघाने  माणसाचा  अहंकार  कमी  होतो.. आपल्या  मनातल्या  वासना,अहंकार  वगैरे  वाईट  गुण  गेले  कि  आपण  शुद्ध  भक्तीच्या  मार्गावर  येतो  आणि  मग  आपल्या  आयुष्याची  खऱ्या अर्थाने वाटचाल सुरु होते..
असं  म्हणतात  कि  आपण  जशी  कृत्य  करतो  तशा  योनीमध्ये  आपला  जन्म  होतो.. वाईट  कृत्य  केल्यावर  नीच  योनीत  प्रवेश मिळतो.. चांगली  कृत्ये  केलीतर  स्वर्गात  जागा  मिळते .. आणि जेव्हा  पाप  पुण्याची  संख्या  बरोबर सारखी  होते  तेव्हा  मनुष्यजातीत  जन्म  होतो.. नीच  योनिबद्दल  काही  वेगळं  सांगायला  नको.. स्वर्गाबद्दल  असं  बोललं  जातं  कि  संचित पुण्य  संपला  कि  स्वर्गातून  पुन्हा  खालच्या  योनीत  आणलं  जातं.. याचा  अर्थ  स्वर्ग  हेही  शाश्वत  स्थान  नव्हे.. आता  उरला  तो मनुष्यजन्म..  जीवाला  हि  मिळालेली  एक  सुवर्णसंधी  असते.. माणसाने  जर  आपल्या  जन्माचा अंतिम  हेतू  ओळखला  नाही ,जर  तो  मिथ्या क्षणिक  भौतिक  जाळ्यात  गुंतून  पडला  तर  त्याचा  मनुष्य जन्म  फुकट  वाया  जातो  आणि  मग  त्याला  पुन्हा  इतर  योनीत  जावे  लागते  अशा  रीतीने  तो  जन्म  मरणाच्या  चक्रात  फिरत  राहतो.. पण  जर  एखाद्याने  प्रपंच  सांभाळता  सांभाळता  परमेश्वराला  ओळखण्याचा,त्याच्या  जवळ  जाण्याचा  प्रयत्न  केला  तर  नक्कीच  त्याला परमेश्वराच्या शाश्वत दिव्य धामात कायमसाठी  प्रवेश मिळतो..  आणि त्याच्या  जन्माचं  सार्थक  होते.. 
मी  हे  सगळं  लिहित  आहे  याचा  अर्थ  असं  नाहीये  कि  मला  हे  जमतं..  खरतर मी  आतापर्यंत  दासबोध आणि  अजून  अध्यात्मिक  ग्रंथ/पुस्तके  वाचले  आहेत  त्यातून  सार  शोधण्याचे  प्रयत्न  करत  आहे.. अजून  खूप  मोठा  पल्ला  गाठायचा  आहे.. :)

ग दि माडगुळकरांनी म्हणले आहेना..



तुझे रुप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम


मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

कधीतरी..



भिजलेल्या मातीत अंकुर फुटेल कधीतरी
सारवलेल्या अंगणात सडा पडेल कधीतरी..

अवखळ वाऱ्याला दिशा सापडेल कधीतरी
वाहत्या प्रवाहाला  उसंत मिळेल कधीतरी..

निळ्या नभांगणात नक्षत्रे चमकतील कधीतरी
वेळूच्या बनात  चांदणं पसरेल कधीतरी..

ओघळणाऱ्या आसवांचे मोती होतील कधीतरी
भरगच्च मनाचे ओझे संपेल कधीतरी..

कधीतरी शब्दाचा अर्थ कळेल कधीतरी
अन त्या अर्थाचा बोध होईल कधीतरी..

शनिवार, ४ डिसेंबर, २०१०

सुदाम्याचे पोहे - ५


हा  लेख  मी  पंकज  आणि  दीपाली  यांचे  खास  आभार  मानण्यासाठी  लिहित  आहे.. :-)

त्यादिवशी  पंकजचा  mail आला  एक  महत्वाचं  काम  आहे,फोन कर  किवा  नंबर दे.. मी  online होतेच, लगेचच  त्याला  call केला..  तो  म्हणला  दृष्टीकोन २०१०  प्रदर्शनाच्या  उद्घाटनासाठी  सूत्र संचालन  करणारं  कोणीतरी  हवय.. मी  दीपालीच  नाव  सुचवलं.. ती  या  क्षेत्रात  expert आहे  आणि  तिला  बराच  अनुभव  आहे म्हणून.. मग  दीपालीला  फोन  केला  आणि  पंकजशी बोल  म्हणलं.. weekday असल्याने  ऑफिसचा  load बघून  रविवार  पर्यंत  final करायचा  असा  त्यांचं  ठरलं.. 
त्यानंतर  याबद्दल  माझं  ना  पंकजशी  ना   दिपालीशी  कोणाशीच  बोलणं  झालं  नाही.. मला  वाटलं  एव्हाना  त्यांचं  ठरलं  असेल  सगळं.. पण  मंगळवारी  सकाळी  कळलं  कि  नेमकं  त्यादिवशी  client visit मुळे दीपालीला  जमणार  नाहीये.. मग  पंकज  म्हणला  बघ  आता  कोणीतरी.. आज  मंगळवार , कार्यक्रम  शुक्रवारी.. आता  २ /३ दिवसच  राहिले  होते.. कोणाला  विचारावं  बघत  होते..
दिपालीशी   बोलता  बोलता  आम्हा  दोघींना  वाटलं  कि  मी  स्वतः  प्रयत्न  करावा  का.. ती  म्हणाली  तुला  कविता  वाचायची   सवय  आहेच ,जमेल  तुला .. मग  पंकजला  विचारला  कि  मी  केलं तर  चालणार  आहेका  तर  तो  म्हणला  कि  मी  सगळ्यात  पहिल्यांदा  विचारलं होतं  तेव्हा  तू  करावस  अशीच  अपेक्षा  होती,तूच  कर.. मी  पुन्हा  त्याला  म्हणालं  मला  कवितेच्या  कार्यक्रमाचा  अनुभव  आहे  बाकी  मी  असं  बाहेर  कुठे  सूत्रसंचालन  केलं   नाहीये.. तर  तो  म्हणला  आपल्याला  heavy निवेदन  नकोय,कार्यक्रम कार्यक्रम  informal असेल .. 
झालं  मग  खूप  mails mails.. पंकजला  ३  दिवस  खूप  mails करून  त्रास  दिला.. :)) सगळ्यात  आधी कार्क्रमाची रूपरेषा  सांग म्हणलं .. मग   त्याने  कोण  कोण  येणार  वगैरे  बद्दल  माहिती  पाठवली,बर्याच  links पाठवल्या..  मंगळवारी  रात्री  बरिस्तामध्ये  भेटायचं  ठरलं,  तिथे  गाईडलाईन्स मी, भूषण माटे (वसंतोत्सव सारखे कार्यक्रम अरेंज करण्याचा दांडगा अनुभव) आणि सुहास (आमची वन मॅन आर्मी) यांच्याकडून मिळतील असं पंकजने सांगितले..
त्या  रात्रीची  गम्मत  म्हणजे   पंकजला  मी  पहिल्यांदा  प्रत्यक्ष  भेटणार  होते.. :) गेले  कित्येक  महिने  आम्ही  mails मधून  बोलत  होतो.. तिकडे  बरीस्ताच्या   बाहेरच  मोठा  ग्रुप चर्चा  कारत  बसला  होता.. पंकजने सर्वांशी  ओळख  करून  दिली.. मी  तर त्या वातावरणाने  एकदम भारावून गेले.. एकतर  ते  सगळे  gr8 photographers होते..  आणि  तिकडे  सगळ्यामध्ये उत्साह  अगदी  सळसळत  होता.. रात्र   झालीये वगैरे  वाटत  नव्हतं.. तिथे पंकज, सुहास, भूषण  आणि  सकाळचे  मिलिंद  वाडेकर  यांची  भेट  झाली.. त्यांच्याशी  कार्यक्रमाची  रूपरेषा ,क्रम  याबद्दल चर्चा करून  मी लगेच  निघाले.. १०वाजता  आमच्या  गदाजे  दरवाजे  बंद  होतात  ना ..
बुधवारी  पंकजने  पाठवलेली  सगळी  माहिती  वाचून  काढली.. फोटोग्राफर्स@पुणे हा ग्रुप गेले सलग ३ वर्ष छायाचित्रांच प्रदर्शन आयोजित करतो.. आणि त्यातून जमा होणारा निधी विद्या महामंडळाच्या special abilities असलेल्या विद्यार्थ्यांना दिला जातो.. व्यासपीठावर सकाळ’चे मिलिंद वाडेकर, डीएनए’चे विलास अवचट, अविनाश गोवारीकर, आणि विद्या महामंडळाच्या मॅडम, इंकफ्लोटचे सुनील जुनेजा असे लोक असतील असं पंकजने सांगितले.. त्या सर्वांबद्दल थोडी माहिती वाचली आणि  त्यातून  एक  कच्चा   मसुदा  तयार  केला.. दीपालीला  म्हणलं  आज  रात्री मी  तुझ्याकडे  येतीय.. माझ्याकडे  data तयार  होता  पण  मला  सूत्रसंचालनाची भाषा  दिपालीकडून  शिकायची  होती.. ती  जवळच  रहात  असल्याने  रात्री  ८.३०ला  तिच्या  घरी  गेले.. ती   ऑफिसमधून  नुकतीच   आली  होती  आणि  तिला  स्वयपाक  करायचा  होता.. तरी  तिने  माझ्यासाठी  आवर्जून  वेळ  काढला.. मी  लिहिलेलं  तिला  दाखवलं  मग  तिने  काही  typical वाक्य  सांगितली  जसे  कि '... यांना  व्यासपीठावर  पाचारण  करते'! तिच्याशी  बोललं  कि  माझा  आत्मविश्वास  नेहमीच  वाढतो.. तिला  खूप  अनुभव  आहे  या  क्षेत्रात  त्यामुळे  तिने  बर्याच  टिप्स  दिल्या.. हे  सगळं  झाल्यावर  तिने  नुकत्याच  लिहीहिलेल्या  '4th seat' या  लेखावर   आम्ही  खुप वेळ  बोलत बसलो.. १०  वाजले  तरी  आमच्या  गप्पा  काही  संपेना.. तिला  म्हणलं  घरून  फोन  यायच्या  आधी  आता  निघते.. hsbc मध्ये  असताना  बसमध्ये  आमच्या  अशा  गप्पा  खूप रंगायच्या, i really miss those days.. असो.. रात्री  घरी  आल्यावर  मग  सगळं एकत्र  लिहून  पंकजला  mail केलं.. त्याने  लगेच  reply केला,थोडे  बदल  सुचविले.. 
गुरुवारी  काय  काय  बोलायचं  final झालं  होतं  पण  आता  वाचायची  practice करायची  होती.. ६च्या  बसने  घरी  आले  आणि  लगेच  आमच्या  इथल्या  भीमसेन  जोशी  उद्यानात  गेले.. बागेत  गारठा  जाणवत  होता.. विशेष  कोणी  नव्हतं त्यामुळे  थोडावेळ  तिथे  मोठ्यांदा  वाचायचा   सराव  केला.. बागेतल्या  थंडीमुळे  कि  काय  मला  सर्दी  झाल्यासारखं  वाटू  लागलं.. वाटलं आता  उद्या  कसं होणार   आणि  लवकर  झोपून  गेले..
3 dec,10.. कार्यक्रम  सकाळी  १०.३० वाजता  सुरु  होणार  होता .. मी  आणि  बाबा  तिथे  थोडं  आधी  पोहचलो.. बाबानाही  प्रदर्शन  बघता  येईल  म्हणून  चला  म्हणलं होतं.. तिथे  गेले  तेव्हा  तयारी  चालू  होती.. क्षितिजा  भेटली.. पंकजने विचारलं  तू  तिला  कशी  ओळखतेस,मी  म्हणलं  hsbc जिंदाबाद.. :) मग  थोडावेळ  तिथल्या  फोटोमध्ये  मी  हरवून इतकी गेलेकी  मला  सूत्रसंचालन  करायचं  आहे  याचा  विसर  पडला.. सगळेच photos एक से एक होते.. बाहेर सर्व  छायाचित्रकारांचे छायाचित्र लावले होते.. माझ्या ओळखीतले तिथे पंकज,क्षितिजा आणि धृवचे photos होते.. तिथले photos आणि बाकी सगळं पाहून बाबा म्हणले तुला या लोकांनी सुत्रासंचालानासाठी कसं काय बोलावलं.. खरंतर मी सगळी स्टोरी घरी आधीच  सांगीतली होती पण माझं सारखच काहीना काही चालू असत त्यामुळे तेव्हा त्यांनी seriously  ऐकलं नव्हतं.. मी:पंकजने विचारलं.. बाबा: पंकजशी तुझी कशी काय ओळख.. मी: सिद्धार्थ कडून पंकजशी ओळख झाली.. सिद्धार्थ मुळे  मला बरेच चांगले मित्रमैत्रिणी मिळाले  इति.. 
त्यानंतर पंकज/सुहास/भूषणने  ऐन  वेळेसचे   थोडे  बदल  सांगितले.. तिथे  खूप  मोकळे  वातावरण  होते  त्यामुळे  माझ्या  मनावरचे  दडपण  एकदम  कमी  झाले.. p@p च्या  सदस्यांबरोबर, विद्या महामंडळाच्या  शिक्षिका ,पत्रकार  वगैरे  यांच्याशी  ओळख  झाली .. थोड्यावेळातच  पाहुण्यांचे  अविनाश  गोवारिकरांचे  आगमन  झाले.. पण  त्यांनी  आल्यावर  थेट  photos बगःयला  सुरुवात  केली.. त्यांचं  बघून  झाल्यावर कार्यक्रम सुरु करण्याचं  मला  सांगण्यात आलं.. ठरल्याप्रमाणे  मी  बोलायला  सुरुवात  केली.. सुरुवात  नीट   होणं  महत्वाचं   होतं  नंतर  फक्त  बाकीच्यांना  call द्यायचे  होते.. एकामागून  एक  सगळं  इतक्या  पटापट  होऊनही  गेलं.. आधी  mike लांब  धरल्याने  मागे  नीट आवाज  गेलं  नव्हता.. मध्ये  पाहुणे  बोलत  असताना एकाने mike जवळ धरायला सांगीतले.. तेव्हाढ्यातल्या  तेव्हढ्यात   मी  त्यांना  विचारलं  कि  मी  फार  fast बोलले  का  तर  ते  म्हणले नाही तसं नाही,चांगलं बोलत आहेस, फक्त mike  जवळ धर.. सगळ्या  पाहुण्यांचं  बोलून  झाल्यावर  सगळ्यांचे  आभार  मानून  कार्यक्रमाची  सांगता  झाली.. आणि  मला  हुश्श   झालं.. 
खरंतर मी थोडावेळच  बोलले आणि कदाचित ते किरकोळ होतं पण माझ्यासाठी ते खूप होतं.. क्षितिजा   म्हणली  चांगलं  झालं  तुझं  म्हणून..  बाबांना  विचारलं  ते  म्हणले  आधी  आवाज  कमी  आला  पण  नंतर  व्यवस्थित  झालं.. मग  मला  बरं  वाटला.. fc रोडवरून  १२.१५ची  infy बस  पकडायची  होती .. म्हणून  मग  पंकज ,सुहास ,भूषण  यांच्याशी  बोलून  मी  लगेचच  निघाले.. मला  संधी दिल्याबद्दल  त्यांचे  पुन्हा  एकदा मनापासून  आभार  मानले.. 
हे  सगळं  इतकं  सविस्तर पणे   सांगायचं  कारण  कि  पंकज  आणि मी  कधीही भेटलेलो  नसताना  त्याने  माझ्यावर  इतका  विश्वास  दाखवला होता  याचं  मला  खूप  कौतुक  वाटलं.. अशा  या  विश्वासाच्या  जोरावर  कोणीही  चांगलं  काम  करू  शकतं,नाहीका.. आणि   दीपालीचे  मला  खूप  मार्गदर्शन  मिळाले.. त्या  दोघांमुळे  माझ्यातला  आत्मविश्वास  दुणावला  आणि  मी  सूत्र -संचालनाचे  काम  माझ्यापरीने  पार  पाडू   शकले.. त्यांची मी मनापासून ऋणी आहे.. :))

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१०

श्यामसुंदरा..

वाट चुकलेल्या वासरास या..  कळपात तुझ्या बोलव रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा..   मनास या सावर रे..


मंत्रमुग्ध वेणूने तुझिया..  मनास या फुलव रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा..  
मनास या सावर रे..

वैजयंती मालेने तुझिया..  मनास सुगंध दे रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा.. 
मनास या सावर रे..

मखमली मोरापिसाने  तुझिया..  मनास सुंदर बनव रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा.. मनास या सावर रे..

सुदर्शन चक्राने तुझिया..  मनास या आवर रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा.. मनास या सावर रे ..

दिव्य लीलांमध्ये तुझिया..  मनास या रमव रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा..  मनास या सावर रे..

गीता उपदेशाने तुझिया..  मनास या वळव रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा..  मनास या सावर रे..

सच्चिदानंद अस्तित्वाची तुझिया..  मनास जाणीव दे रे..
श्यामसुंदरा.. श्रीकृष्णा..  
मनास या सावर रे..

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१०

चिऊताई चिऊताई..

चिऊताई चिऊताई
पहाटे पहाटे इतक्या, तू कशी उठतेस ग
उबदार रजई घेऊन, थोडं लोळावं अजुन, तुला वाटत नाही काग…

चिऊताई चिऊताई
इतकी कशी चिवचिव तुझी, सतत चालू असते ग
थोडा वेळ शांता बस, असा सारखं कोणी, तुला रागावत नाही काग…

चिऊताई चिऊताई
एक एक दाणा खोऊन ,तुझं पोट कसं भरतं ग
बर्फाचा गोळा बघून, रडून हट्टा करावा,तुला वाटत नाही काग….

चिऊताई चिऊताई
इकडे तिकडे उन्च खाली, कशी काय तू फिरतेस ग
शाळा अन् अभ्यासाच्या, नावाखाली सारखं कोणी, तुला रागावत नाही काग…

चिऊताई चिऊताई
तू माझी अन् मी तुझी, जागा एकदा बदलुया काग
रोज तेच तेच करून, वेगळं काही करावं, तुला वाटत नाही काग..

आकाश क्षितिज खरे का खोटे..

आकाश क्षितिज खरे का खोटे..
सांगा ना मला कोणीतरी
आकाश क्षितिज खरे का खोटे..


स्वप्नात येतात परी..
गोष्टीत येतात राक्षस..
परी, राक्षस खरे का खोटे..
सांगा ना मला कोणीतरी
आकाश क्षितिज खरे का खोटे..


भीती वाटते भूतांची…
गोष्टी आवडतात देवांच्या..
देव, भूत खरे का खोटे..
सांगा ना मला कोणीतरी
आकाश क्षितिज खरे का खोटे..!!

आहे काय अन् नाही काय...

रडले काय अन् हसले काय 
भाव माझे, कोणास काय 
आयुष्य माझे, अस्तित्व माझे 
आहे काय अन् नाही काय... 

खचले काय अन् सावरले काय 
भोग माझे,कोणास काय 
आयुष्य माझे, अस्तित्व माझे 
आहे काय अन् नाही काय... 

हरले काय अन् जिंकले काय 
दैव माझे,कोणास काय 
आयुष्य माझे, अस्तित्व माझे 
आहे काय अन् नाही काय... 

तोडले काय अन् जोडले काय 
मन माझे,कोणास काय 
आयुष्य माझे, अस्तित्व माझे 
आहे काय अन् नाही काय... 

खोडले काय अन् लिहिले काय 
शब्द माझे,कोणास काय 
आयुष्य माझे, अस्तित्व माझे 
आहे काय अन् नाही काय...!!! 

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०१०

मंतरलेले दिवस - ८

नेहमीप्रमाणे आम्ही कॅन्टीन  मध्ये  नाश्ता  करायला  गेलो होतो..  काहीतरी  आणायला  म्हणून  counter  पाशी  गेले  तेव्हा  एक  मुलगा  पुढे  उभा  होता..  जागेवर आल्यावर त्याच्याकडे  सहज  लक्ष  गेलं  तर  तो  त्याच्या  मित्राच्या  आधाराने  चालत  होता..  नीट पाहिल्यावर कळलं  कि  त्याला  अजिबात  दिसत  नव्हतं..   त्याच्या  शेजारी  मी  उभी  होते  तेव्हा हे  मला  चुकूनही  जाणवलं  नव्हतं..  आम्ही  सगळ्याजणी  चाटच  पडलो..  काहीच   दिसत  नसताना  तो  सगळं  कसं  करत  असेल..  प्रत्येक  क्षणाला  त्याला एखाद्याचा  आधार घ्यावा लागत  असेल… campus किती  मोठा  आहे, साधं  canteen मध्ये  जायचं  म्हणालं  तरी  कोणीतरी  सोबत  लागत  असेल..  तो  कोणत्या  प्रकारचं  काम  करत  असेल,कसं  करत  असेल..  तो कुठे  राहत  असेल..  हिंजेवाडीला  इतक्या  लांब  कसा  येत  असेल?

असं  म्हणतात  कि  एखादी  गोष्ट  आपल्याला  कमी प्रमाणात  मिळाली  असेल  तर  देवाने  दुससरी  कोणतीतरी  गोष्ट  भरभरून  दिली  असते  कि  जेणेकरून   सगळी कसर  भरून  निघते..  पण  आपल्याकडे  आहे  त्या  गोष्टींचा  शोध  लागणं  हेच  जरा  अवघड  असतंना..  त्या  मुलामध्येही काही  खास  गुण  नक्कीच  असणार  ज्याने  त्याचा  आयुष्य  सुंदर  होत  असेल..  त्या  मुलाचे,त्याला  आधार  देणाऱ्या  त्याच्या  मित्रांचे, त्याला  प्रोत्साहन   देणाऱ्या  आणि काळजी  घेणाऱ्या  त्याच्या  पालकांचे, त्याला योग्य शिक्षण  देणाऱ्या  शिक्षकांचे  आणि  त्याला  नोकरी  देणाऱ्या  office चे  कौतुक  करावे  तितके  कमी  आहे..

ती  व्यक्ती  अवघ्या  क्षणात  खूप  काही  शिकवून  गेली..  सगळं  चांगलं  असताना  आपला  सूर  बरेचदा  तक्रारीचा असतो..  माझं  हे  असंच  का  आणि  ते  तसंच  का..  पण  आजूबाजूला  बघितल्यावर   कळत  कि  देवाने  जितकं  दिलय  ते  खूप  आहे  आणि  त्यासाठी  आपण  नेहमी  कृतज्ञ व नम्र  राहिलं  पाहिजे..  देवाच्या  कृपेने  आपणास  जे  काही  मिळालय  त्याचा माज न करता  चांगल्या  कारणांसाठी  सदुपयोग  केला  तर  आपल्या  आयुष्याचं  नक्कीच  सार्थक  होईलना! :)

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०१०

तो आणि ती..

तो अफाट गरजता सागर 
ती त्यामधे सामावलेली निश्‍चल सरिता 

तो उसळत्या लाटा 
ती त्या लाटांचा किनारा 

तो एक हिरवगार पान 
ती त्यावर पडलेला सुंदर दवबिन्दु 

तो विस्तीर्ण शाखा 
ती त्यावर पसरलेला नाजूक वेल 

ती एक कोमल फूल 
तो त्यामधे गुंतलेला भूंगा 

तो एक शिंपला 
ती त्यामधला टपोरा मोती 

तो एक शंख 
ती त्यामधे लपलेली लाजाळु गोगालगाई 

तो एक मजबूत होडी 
ती त्या होडीचे शीड 

तो एक अतुट दगड 
ती त्यामध्ये कोरलेले सुंदर शिल्प 

तो मुरलीधरची मुरली 
ती त्या मुरलीतुन उमटणारे मधुर सूर...! 

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

मंतरलेले दिवस - ७


गोष्ट एका हट्टखोर मुलीची.. :)


त्या   दिवशी  sms आला “moonlight trek over this weekend”..   असे सारखेच काहीना  काही sms  येत असतात..  पण ‘कात्रज –  सिंहगड moonlight trek’  हे  माझं  फार  पूर्वीपासूनचं  स्वप्न होतं  म्हणून  लगेच  फोन   करून  माहिती काढली..  शनिवार,अजून  अवकाश  होता  तोपर्यंत  कोणी  मैत्रिणी  तयार  होतात  का  पाहू म्हणलं..  सगळ्या ‘single’ मैत्रीणीना, अगदी ज्या नेहमी 'नाही' म्हणतात अशांना  देखील  मी  नवीन  उत्साहाने  आणि  आशेने  पौर्णिमेच्या  रात्रीचं  वर्णन  करून trek  बद्दल विचारलं..  पण  सगळ्याजणी ‘नाही’ म्हणाल्या.. ‘नाही’  ऐकायची  आता  सवय   झाली  आहे  त्यामुळे   मी फार  मनाला  लावून  घेतलं नाही..  प्रत्येकाच्या  वेगवेगळ्या priorities  असतात  मी  समजू शकते..  पण  मोठा  प्रश्न हा  होता कि  आता घरच्यांना  कसं पटवायचं! Yes  मग  शनिवारी  सकाळी  आमच्या  घरी रामायण घडलं..  :)

मी: आई,  मी  परवा  म्हणत  होतेना  पौर्णिमेच्या  रात्री moonlight trek आहे..  मला  केव्हापासून  करायचं  तो trek..  मी  जाऊ काग?
आई: हेबघ,  मला  काही  विचारू  नकोस trek  चं वगैरे..  बाबांशी बोल..
मी: बाबा..
बाबा:  रात्रीच्या ट्रेकला  मुळीच  जायचं नाही..  सकाळी  जाऊन  संध्याकाळी यायचं  असेल  तर जा..
मी:  अहो बाबा,  हा  खास  रात्रीचा  ट्रेक आहे..  आणि  वर्षातून  कधीतरीच  हा  ट्रेक असतो..  चांदण्यात  मस्त  फिरत फिरत..
बाबा: काहीतरी काढत  असतेस तू.. आता  तर कोकणात जाऊन आलोना.. सारखं सारखं काय ..
मी: कोकणाचा आणि ट्रेकचा काय संबंध.. तुम्ही  शबाताईला विचारा.. तिने पुर्वी केला होता हा ट्रेक.. सगळेच करतात.. खूप प्रसिद्ध ट्रेक आहे हा..
बाबा: कोण कोण आहे ट्रेकला?
मी: जंगल क्लब ट्रेक ग्रूप.. २०/२५ जण असतील.. 3 अनुभवी लोक ‘लीडर’ आहेत या ग्रूप चे..
बाबा: तुझ्या ओळखीच्या मैत्रिणींपैकी कोणीच नाही?
मी: नाही.. :(
बाबा: नाहीना, मग तुला कसं काळात नाही.. रात्रीच्या ट्रेकला नाही जात नसतात असं ..
(झालं माझ्या  डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या..)
मी: बाकीच्याना मी कालपर्यंत  विचारत होते.. कहीना आवड नाही तर कहीना वेळ नाही.. मी काय करू मग?त्या नाही म्हणतात म्हणून माझं  रद्द  का करू? उद्या त्यांच्याकडे वेळ असेल आणि मझयाकडे नसेल.. सगळ्यामैत्रिणिंची लग्न झाली   किवा ठरली आहेत,त्या व्यस्त आहेत.. मग मी का त्यांच्यावर अवलंबुन राहू..
बाबा: अग तेच तर आम्ही म्हणत आहोत.. सगळ्या जणीन्सारखी तू वाग आता.. लग्न झाल्यावर नवार्‍या सोबत पाहिजे तिथे  वाटेल तितक  फिरायला जा आमची काही हरकत नाही..
मी: याचा अर्थ लग्न होईपर्यंत मी दारं खिडक्या बंद करून घरी बसू का.. या वीकेंड्ला काही plan नाहीतर मग काय हरकत आहे ट्रेकला जायला.. मुली हिमालयात ट्रेकला जातात आणि मी साधं सिंहगडला जाऊम्हणत आहे..  तुम्ही सगळे मला हट्टी म्हणता.. पण मी कोणत्या वाईट गोष्टीसाठी हट्ट करते का.. तुम्ही कोणीसमजून घेत नाही मला..  (गंगा जमुनेला पूर आला)
बाबा: तू  ठरवलं आहेस जायचं तर आम्हाला विचारतेस कशाला..
मी: असं काही नाहीए.. मी तुम्हाला विचारात आहे,जाऊ का म्हणून..  माझं फक्त एव्हाढच म्हणणं आहे की तुम्हीत्या ऑफीस मध्ये  चला,आपण सगळी नीट माहिती काढू मग ठरवू.. म्हणजे मग तुम्हालाही काळजी वाटणारनाही..

अशा रीतीने बाबांकडून परवानगी मिळवली.. ट्रेकला कोण कोण सोबत येणार,किती मुली वगैरे खात्री  करून मग बाबा हो म्हणाले.. ज शुक्रवारी रात्री पाऊस धोधो कोसळाला होता त्यामुळे ट्रेक ‘मूनलाइट ट्रेक’ कसा होणार अशीशंका होती मला.. म्हणलं जाऊन तर बघुया.. शनिवारी नल स्टॉप जवळ पिक अप पॉइण्ट होता.. बस मध्ये लीडर सोबत ओळख झाली.. बाकी सगळे आपल्या आपल्या ग्रूप मधे होते.. बस सुटल्यावर  वाटू लागलं आपणएकटं चाललोय हे बरोबर आहे का वगैरे..  खिडकीतून  बाहेर पाहिलं तेव्हा तो माझा चांदसखा हसत म्हणाला ‘मी अहेना तुझ्यासोबत!’ :) घरी एकदा फोन करून सान्गितलं की ग्रूप चांगला आहे तुम्ही शांतपणे झोपा,सकाळी फोन करेन..
रात्री  १० वाजता आम्ही कात्रज घाटापासून चढायला  सुरुवात केली..  तिथे  पहिल्यांदा  सगळ्यांच introduction झालं..  आम्ही  एकूण २०   जण होतो..  ५/६   मुलींच्या  ऐवजी मी धरून आम्ही तिघीच होतो.. आमच्यातले तिघेजण  थोडे  वयस्कर  काका  होते  पण  त्यांचा  उत्साह  सगळ्यात  दांडगा होता..  एक  इयत्ता  सातवीतला  छोटू होता,सर्वात पुढे पळत होता..   त्याचे  वडील  त्याला  सगळ्या trek ला  आवर्जून  घेऊन जातात..  इतक्या लहान  वयात  त्याचे  बर्यापैकी treks  झाले  आहेत,हे  पोरगं  मोठेपणी  नक्की  मोठा trekker होणार!

सरांनी सूचना आणि घोषणा  देऊन  डोंगरांची  वाट  सुरु झाली ..  डोंगरावर  सर्वत्र गुढघ्याच्या उंची  एव्हढ  वाळलेलं  गावात  पसरलं  होतं  आणि  त्यामधून  एक  छोटीशी पायवाट.. torch  ची  गरज  भासत  नव्हती  इतकं  स्वच्छ  टिपूर  चांदणं  पडलं होतं..  एका  बाजूला  डोंगरांच्या रांगा..  आणि  दुसरीकडे  खालती  कात्रज  घाट  आणि ‘ आमचं पुणं’ दिव्याच्या  प्रकाशात  झगमगत होतं!  उकाडा  जाणवत  नव्हता  ना  थंडी  वाजत  होती  अशी  एकदम  आल्हाददायक  हवा होती.. photos  काढायचे  प्रयत्न  करत  होते  पण  जमलं नाही.. एकतर  रात्रीचे photo  मला  काढता  येत  नाही  किवा  माझ्या   कॅमेराचा problem होता..  आमच्यापैकी  एकजण photography  course  करणारा होता..   तो सगळीकडे  अगदी  stand  काढून  सगळं set  करून photo काढायचा.. त्याला   म्हणलं  मला नंतर  सगळे photos पाठव   आणि  मग  मी कॅमेरा  आत  ठेवून   मोकळेपणाने  ट्रेकचा  आनंद  घेऊ लागले..  आता  सगळे  एका  मागून  एक  चालत  होते  त्यामुळे  एकत्र  झाले होते.. ‘ जगते राहो’ ‘ हर  हर महादेव'  वगैरे  गर्जना  चालू होत्या..  या  सगळ्या  वातावरणात  आपण  अपरात्री  कुठतरी  अनोळखी  लोकांसोबत  भटकतोय  असं  मुळीच  वाटत नव्हतं..

"पर्वतांची दिसे दूर रांग.. काजळाची जणू दाट रेघ !!!"  पहिला  डोंगर  संपला  असं  कळल्यावर  आम्हाला  किती  आनंद  झाला  काय सांगू..  तिथून   पुढे  एकदम  दूरवर  सिंहगड  च्या tower   वरचा  लाल  रंगाचा  दिवा  चमकताना  दिसू लागला..  अरे  बापरे  एव्हढा  लांब  कसा  काय  जाणार आपण  असे   प्रश्न  सगळ्यांनाच   पडू लागले..  ट्रेक  खरतर  अवघड नव्ह्ता..  पण  असे १५   डोंगर  पार  पडायचे  होते  हि  खरी  गम्मत होती..  या  अशा  ट्रेकची  कल्पना  सर्वात  प्रथम  कोणाच्या  डोक्यात  आली  असेल,हि  छोटीशी  पायवाट  कोणी  केली  असेल  असे  असंख्य  प्रश्न  माझ्या  मानता  येत होते..
१२.३०ला    एका  पठारावर break  घेतला  तिथे  आम्ही sandwiches बनवले.. :)  खरतर   रात्री  जेवूनच  आलो  होतो  तरी sandwiches  वर  ताव  मारताना  तसं  काही  जाणवलं नाही ..   माझ्यासोबत  ज्या  दोघी  मुली  होत्या  त्या  त्यांच्या  मित्रांसोबत  आल्या होत्या..  त्यातली  एकजण  मागे  पडत  होती  म्हणून  तिचे  मित्र  तिच्या  सोबत  मागे होते..  आणि  दुसरी  ऋजुता  माझ्यासोबत  पुढे होती..  आम्ही  दोघी  पूर्ण  ट्रेक  एकत्र  होतो  त्यामुळे मी  एकटी  वैगरे   नव्हतेच मुळी.. मध्ये breaks  घेत  पुढे  पुढे  जात होतो..  हजेरी  घेता  घेता   सरांनी   मधेच  एक dialogue  मारला “ आपल्यातली  संख्या  जास्त  तर  झाली  नाहीना  ते पहा ..  रात्र  पौर्णिमेची आहे”   तेव्हा  जाणवलं  कि  आम्ही  असे  एकटेदुकटे  फिरत  आहोत  पण  भूताखोरांचा   विचार  चुकूनही   मनात  डोकावला नाही..  साग्लायचे  काहीना  काही jokes  चालू  होते  अर्थात  मी silent mode  ला होते..  मलाना  किती  आणि  काय  काय  पाहून  घेऊ  असं  होत होतं.. “ चांदण्याचे  कोटी कण,  आठवांचे  ओले सण !”

एका  break  मध्ये  गाण्याचा  कार्यक्रम झाला..  तेव्हा  मी  सगळ्यांची  परवानगी  घेऊनच  मग  माझी  कविता ऐकवली.. ;)  सहसा कवितेमध्ये तेही आमच्यासारख्यांच्या  कवितेमध्ये  फार  कमी  लोकांना  उत्साह असतोना..  पण  ते  बिचारे  दामले  होते  म्हणून  कि काय..  काही  आढेवेढे न   घेता  त्यांनी  कविता  ऐकून घेतली!!  मध्ये  अधे glucose/ लिंबू  सरबताचे  डोस   चालू होते..  मग  यापूर्वी  कोणी  किती trekking  केलं  याबद्दल  जोरात  चर्चा  सुरु झाली..  मधेच  कधीतरी mobile  ची  आठवण  झाली  म्हणून  काढून  पाहिला   तर ४   वाजले होते , वाटतही नव्हतं..  मी  आणि  रुजुताने  सरांना ‘ चहा चहा ’  म्हणून  बराच  त्रास दिला..  सिंहगडावर   चहा  मिळेल  अशी  अशा  दाखवून  त्यांनी  आम्हाला  प्रोत्साहन  दिलं .. ;) नंतर   नंतर  आम्ही  सरांना  विचारायचो  अजून  किती  डोंगर  राहिले  तर  ते  म्हणायचे  तो  काय  दिसतोय न  सिंहगड , आलोच  आता जवळ  आलो आपण.. trekkers  लोकांचा  हा typical dialogue  आहे  हे  मी  जाणून होते..  म्हणलं  तो  चंद्र  पण  जवळ दिसतोय,  जायचा  का तिथे.. ;)  कधीतरी  मधेच वाटलं ..  आपण  कुठे  चाललो आहोत ,कशासाठी..  हे  बरोबरचे  कोण आहेत..  तेव्हा  जाणवलं  कि  आता  आपल्याला  झोप  यायला  लागली आहे .. hahaha..

आता   सिंहगड   थोडा  जवळ  वाटू लागला..  आणि  नेमके  तिथे  थोडे  ढग आले..  बघता  बघता  चंद्र  ढगात  दिसेनासा  झाला  आणि  एकदम  अनाधार पाडला..  इथे torch  ची  गरज पडली..  तेव्हा  मागे  वळून  पाहिलं तर  प्रत्येकच्या torche  चा  प्रकाश  एका  रांगेत इतक a  सुंदर  दिसत  होतं  कि  मला  वाटलं  काश  मी  असं photo  काढू  शकले असते..  त्या  डोंगराच्या  वर येईपर्यंत  चक्क   उजाडला होतं..  आम्हला  वाटलं  आतातरी  आला  पण  अजून ३   डोंगर  राहिलेच होते..  घरी  फोन  केला  तेव्हा  बाबांना  म्हणालं  अजून  आम्ही  सिंहगडला पोहाचायाचोत..  बाबा  म्हणले  रात्रभर  काय  केलं मग .. :)

पण  आता  खरच  बास  वाटू  लागलं होतं..  शेवटचा  टप्पा  नाही  म्हणायला  थोडा  कठीण वाटला ..  अजून  नाही  चालवणार  पुढे  असं  होत होतं..  थोडं  चाललं  कि break  असं  प्रकार  चालू होता..  शेवटी  ८.३०ला  आम्ही  जेव्हा destination  गाठलं  तेव्हा   आम्ही  आनंदविभोर झालो.. :)  यावेळेसची  कांदा भाजी + झुणका  भाकर +  चहा   सगळ्यात बेष्ट होता..  शेवटी group photo  काढून  सगळे  बस  मध्ये  बसले आणि एका  क्षणात  गाढ  झोपून गेले..   अशा  ट्रेक  नंतरची  ती  झोप किती  लई  भारी  असते  हे  अनुभवी  लोकच  समजू शकतात..

घरी येताना मनातून मी आई बाबांचे खूप आभार मानले.. ते हो म्हणाले म्हणून मला इतका छान ट्रेक चा अनुभव घेता आला.. आणि तसही माझे हट्ट आईबाबा नाहीतर कोण पुरवणार!!! :)

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०१०

अजुन काय कशाला...

तुझ्या माझ्या भेटीला   
एक पाऊस पुरेसा   
अजुन काय कशाला...   
  
तुझ्या माझ्या गप्पांना   
एक चहा पुरेसा   
अजुन काय कशाला...   
  
तुझ्या माझ्या क्षणांना 
एक आठवण पुरेशी   
अजुन काय कशाला...   
  
तुझ्या माझ्या वादाला   
एक अश्रू पुरेसा   
अजुन काय कशाला...   

तुझ्या माझ्या आनंदाला 
एक पाणीपुरी पुरेशी   
अजुन काय कशाला...   
  
तुझ्या माझ्या कथेला   
एक कविता पुरेशी   
अजुन काय कशाला...