रविवार, ३ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३० : १५

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 15: 19th June,11


Kathmandu

आजचा पूर्ण दिवस आराम करण्यासाठी मोकळा ठेवला होता.. काहीच कार्यक्रम नव्हता.. सिमास चे सगळे मंडळी आज काठमांडू -> दिल्ली -> पुणे असे जाणार होते.. मी काल केळकर काकांना म्हणलं मलाही आज यायचं पुण्यात.. पण आता ऐनवेळेस बदल करणं फार महागात पडलं असतं म्हणून तो विचार डोक्यातून काढून टाकला..
आज  निवांत उठलो.. चहा घेताना कळला कि केसरीची एक तुकडी आमच्या नंतर आली होती त्यांना पहिल्या दिवसानंतर परतावे लागले.. हिमवर्षावामुळे डोलमा पासला जाता नाही आले आणि परिक्रमा पूर्ण झाली नाही.. हे ऐकून मी भूतकाळात शिरले.. माझ्या ओळखीच्या सर्वांनी ही यात्रा केसारीसोबत केली असल्याने मी सर्वात प्रथम केसरीकडे चौकशीला फोन केला होता.. तेव्हा तिकडची एक मुलगी जूनच्या ग्रुपमध्ये एकच जागा शिल्लक आहे ,लवकरात लवकर बुकिंग करा म्हणली मग मी त्याच संध्याकाळी फर्गुसन रस्त्यावर त्यांच्या ऑफिस मध्ये गेले.. आणि तिथे गेल्यावर या madam  म्हणतात की जून मध्ये नाहीतर जुलै मध्ये जागा आहे.. मला म्हणे तुम्ही जुलै मध्ये जा.. आता ती कोण ठरवणारी मी कधी जायचं ते.. बर जागा नसू शकते जून च्या ब्याच मध्ये पण मग फोनवर खोटं कशाला बोलली.. तिला वाटलं असेल एकदा ऑफिसमध्ये समोरासमोर बोलू आणि जुलै च्या ग्रुपमध्ये नाव टाकू..  पण हे असं खोटं बोललाना कोणी कि माझ्या डोक्यात शॉट जातो.. मी म्हणलं मी काम करते ,मला सुट्टीच पाहावा लागता.. जूनमध्ये  सुट्टी मिळेल.. फोनवरच तुम्ही सांगितला असतं जून ची ब्याच भरली आहे तर मी आलेच नसते ना  अशी धावत.. तर ती म्हणायला लागली  आमच्या ब्याचेस २/३ महिन्याआधीच भरतात वगैरे.. मी म्हणलं  बघा जून मध्ये जागा असेल तर ठीक आहे नाहीतर राहूदे.. तर ती नाहीच म्हणली.. मग मी तिला म्हणलं  फोनवर चुकीची माहिती देत जाऊ नका आणि निघून आले... खाली आल्यवर माझ्या डोळ्यात पाणी आले होते की आता मला जाता येणार नाहीका.. मला पुढे अजिबात ढकलायचे नव्हते.. त्यावेळेस माझे आईबाबा पूर्ण तयार झाले नव्हते त्यामुळे मला पाठींबा कोणाचाच नव्हता.. मनातून देवाला म्हणलं मला ही यात्रा आताच करायची आहे.. थोडी निराश झाले होते पण लगेचच सचिन trv कडे जाऊन विचारपूस करायची ठरवले आणि थेट सचिनचे जंगली महाराज रस्त्यावरचे ऑफिस गाठले.. सचिनची ब्याच ५ जून ला आहे आणि त्यात भरपूर जागा आहेत हे कळल्यावर मला फार आनंद झाला.. सचिनचं तसं चांगलं नाव आहे म्हणलं जाऊ आता,पुढे होईल तसं होईल..  नंतर मला केसरीचा १० वेळा तरी कमीतकमी फोन आला कि जूनच्या ग्रुपमध्ये एक जागा आहे म्हणून.. मला त्यांचं असं वागणं काही झेपलं नाही.. मी त्यांना दाद दिली नाही आणि सचिन कडे बुकिंग केले.. आणि आज समजतय की मला केसरीच्या जून च्या ग्रुपमध्ये जागा नाही मिळाली किती चांगली गोष्ट होती.. आज देवाने मला पुन्हा दाखवून दिले कि 'प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते.. आणि जे होते ते आपल्या चांगल्यासाठीच..'
नंतर आम्हाला खरेदीसाठी एकीकडे नेले गेले तिथे एक मोठा mall  होता.. आता पुण्या मुंबईत काही malls  नाहीयेत का.. आणि या mall  मध्ये इथलं काही खास वेगळं नव्हतं किवा काही स्वस्तही नव्हतं.. तरीही सर्वांनी तिकडे भरभरून खरेदी केली याचं मला फार आश्चर्य वाटलं.. लोकांकडे खूप पैसे आहेत,अजून काय.. मी मात्र एक पैसाही त्या mall  मध्ये खर्च केला नाही.. खरंतर आमच्या हॉटेलच्या परिसरात चांगलं मार्केट होतं.. त्या mall  मधून आल्यावर मी इथे फिरले आणि थोडी खरेदी केली.. :) आता इथे चांगलाच पाऊस चालू होतं.. महेश म्हणला आपण mountain  flight  आधीच केले बरे झाले,आता ते सगळं पावसामुळे बंद झालं आहे..
जरा थकलो होतो म्हणून आणि पावसामुळे आज काठमांडू मध्ये विशेष कुठे फिरलो नाही.. संध्याकाळी गेटटुगेदर होते तेव्हा आम्हा सर्वाना यात्रा पूर्ण केल्याचे abc adventure कडून प्रशस्तीपत्रक देण्यात आले.. :) ते देताना महेश सर्वांबद्दल बोलत होता.. माझ्याबद्दल म्हणला कि डोलमा पास झाल्यावर हिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो अवर्णनीय आहे,मी भीम भय्या , केळकर काका आम्ही त्या आनंदाचे साक्षीदार आहोत!!!
रात्री bag  packing  चे मोठे काम केले...



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: