रविवार, ३ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३० : १३

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 13: 17th June,11


Dongaba -> Nyalam

सकाळी लवकर उठून प्रवास सुरु.. आज दिवसभर फक्त प्रवास.. संध्याकाळी न्यालमला मुक्काम.. प्रवास खूप सुंदर होता.. जाताना दिसलेल्या गोष्टी परत दिसत होत्या त्यामुळे सगळा परिसर आता परिचित वाटत होता.. बाहेर अजूनही थंडगार वारे वाहतच होते.. कितीही काढूनही अजून फोटो काढणे चालूच होते..
दुपारी जेवणासाठी एका मोकळ्या जागेवर थांबलो होतो.. चोहीकडे हिमशिखरे.. शेजारी खळखळ वाहणारी नदी.. अशा ठिकाणी आम्ही लुसलुशीत गवतात खाली बसून निवांत जेवण केले.. 'ये हसी वादिया, ये खुला आसमा' या ओळीचा perfect  अर्थ एव्हाना समजला होता..  भीम भय्या, महेश आणि सगळे शेरपा लोकं कैलास मानस दर्शन सुखरूप झाल्याने खूप relax होते ,त्यांच्यावर आम्हा सर्वांची जबाबदारी होतीना...
मध्येच केळकर काका म्हणले अगं चेहरा कसा झालाय तुझा, साल निघायला लागलं आहे, cold  cream  लावत आहेस ना..  मी म्हणलं सकाळ संध्याकाळ निविया फासत आहे.. तर ते म्हणले  तसं नाही, क्रिकेटवाले कसा क्रीमचा थर लावतात तसा लाव.. म्हणजे पुण्यात जाईपर्यंत चेहरा नॉर्मल होईल..
मला फार आश्चर्य वाटलं की ते अगदी घरच्यान्सारख मला सांगत होते..  खरतर आता सर्वांचे चेहरे ट्यान झाले होते आणि असं आम्हा कोणालाही आमच्या घरचे किवा friends  यांनी असे पहिले असते तर कोणी ओळखू शकलं नसतं.. इतके दिवस परिक्रमा पूर्ण करायचा लक्ष होता आणि पूर्णवेळ स्कार्फ, माकड टोपी घातलेली होती त्यामुळे कोणाच्याही चेहऱ्याकडे कोणाचेही विशेष लक्ष गेले नव्हते.. आणि मुख्य म्हणजे कुठेच आरसा नसल्याने आपण स्वतः कसे दिसतोय याची कल्पना कोणालाही नव्हती.. अज्ञानात सुख असतं ना! गाडीच्या आरशात बघायची बुद्धी झाली नाही तिकडे हे बरं झाले एका अर्थाने..
आता काही इतक्या दिवसांचे secrets सांगते.. :) ६ तारखेला काठमांडू सोडल्यापासून अंघोळ केली नव्हती ती काठमांडू ला पोहाचाल्यावारच करायला मिळणार होती.. आणि कपडेही बदलले नाही.. घाम वगैरे नसल्याने आणि प्रचंड थंडी असल्याने विशेष फरक पडला नाही.. सागा सोडला तर सगळीकडे राहायचे हॉटेल्स खूप साधे असून कुठेही टोयलेटची सोय नव्हती.. अर्थात याची कल्पना आम्हाला आधीच दिली गेली होती.. त्यामुळे कित्येकदा चांदण्यात.. स्वच्छ खळखळत्या नदीशेजारी, समोर कैलास दिसतोय अशा ठिकाणी आमचे हे कार्यक्रम  चालायचे.. सगळ्या महिला मंडळाचा हा एक सार्वजनिक कार्यक्रम असायचा.. :
तुम्हाला वाचताना कसेतरी वाटत असेल पण लपवायचा काय त्यात.. जर कोणाला अशा यात्रा करायच्या असतील तर  हे सगळं माहिती असायला पाहिजे आणि यासाठी मनाची तयारी पाहिजे!!! तसं ट्रेकिंग वाल्यांना जास्त जड जात नाही हे.. :)  सचिनवाल्यांनी पहिल्या मिटिंग मध्ये या कार्यक्रमाला 'जंतर मंतर' असे नाव दिले होते.. बरं पडायचं ते कोणाला सांगायचं असल्यास.. हे नाव  फारच प्रसिद्ध झाले नंतर..
संध्याकाळी न्यालमला पोहचले.. आताचे हॉटेल चांगले होते.. तिथे वॉशरूम मध्ये आरसा होता..
एव्हढ्या दिवसांनी मी जेव्हा मला आरशात पहिले तेव्हा खरं सांगते मी मला ओळखूच शकले नाही.. सगळेच असे वेगळे दिसत होते पण त्यातला त्यात आता माझा चेहरा जास्तच  बदलला होता.. कारण माझ्या मनासारखी माझी त्वचाही खूप सवेंदशील आहे.. आणि चालताना दम लागायचा त्यामुळे नाक ओठ खुपदा उघडे ठेवावे लागायचे.. त्यामुळे माझ्या नाकाचे साल पूर्णपणे निघाले होते.. आणि सततच्या बदलणाऱ्या हवामानामुळे , कधी उन्ह कधी पाऊस कुठे बर्फ लागून चेहरा पार काळवंडला होता..
तेव्हा मला  कवी गोविंद यांची हि कविता आठवली.. :)
जुनी इंद्रिये, जुना पिसारा.. सर्व सर्व झडणार हो..  
नव्या तनुचे, नव्या शक्तीचे.. पंख मला फुटणार हो..
सुंदर मी होणार.. सुंदर मी होणार..
नंतर पाण्याने चेहरा पुसून काढून निवियाचा थर लावला आणि शांत बसले.. रात्री  सर्वांकडून  पैसे  गोळा  करून  ड्रायवर  आणि शेर्पाना  टीप  म्हणून  देण्यात  आले.. १३ शेरपा मिळून ५०० rs गोळा केले गेले.. पण मला वाटले वाटून त्यांना प्रत्येकाला किती कमी येतील.. मग मी प्रत्यकी १०० रुपये दिले.. खरतर तेही कमीच होते कारण ही यात्रा शेरपा लोकांमुळेच सुखरूप झाली होती.. all credit goes to them.. आमच्यापैकी काही असे होते की खरेदीला वाटेल ते घ्यायचे आणि टीप देताना मात्र मन छोटं होत होतं त्यांचं,त्यांनी २००/२५० रुपयेच दिले.. चालायचंच..



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: