बुधवार, २७ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३४

Education makes a difference..


Infy campus! इथे येऊन आता मला जवळ जवळ एक वर्ष होईल पण अजूनही दररोज मला ती सुंदर फुलं पाने, हिरवळ ,पाखरे तेव्हढंच मोहवून टाकतात.. रोज सकळी ऑफिस मध्ये आले की किती अन काय पाहू असं होतं..  कधी कामाचा वा इतर गोष्टींचा ताण आला किवा कधी कंटाळा आला, झोप आली, ब्रेक हवा असेल किवा कधी  कधी काहीही कारण नसतानाही की या बागेत एक चक्कर मारल्यावर एकदम टवटवीत वाटते .. उन्हाळ्यात हिरवगार असलेल्या या परिसराचा रुबाब पावसाळ्यात तर विचारूच नका.. छान छान रंगेबिरंगी फुले उमलेली दिसतात.. हिरव्या गालिच्याची किनार लिलीच्या पांढर्या फुलांनी एकदम खुलून दिसते..  झाडांवर फुलांवर पावसाचे पाणी पडल्याने ते अजूनच सुंदर दिसतात.. आणि या सौदर्याचा उपभोग मी जास्तीत जास्त घेते..

परवा असंच फिरत होते तेव्हा पाऊस सुरु झाला.. मग मी माझ्या खाजगी जागेत म्हणजे अम्पी थेटरपाशी आले..  :) मी कुठे सापडले नाहीतर तिकडे असते असं मी माझ्या मैत्रिणींना सांगून ठेवलं आहे.. हे  थेटर अशी एक मोकळी जागा आहे जिथे इन्फीचे मोठे कार्यक्रम होतात.. पण एरवी दुपारी तिथे कोणी नसतं.. एक छोटं स्टेज आणि त्याभोवती प्रेक्षकांना बसण्यासाठी वर्तुळाकारात फरशीच्या पायऱ्या.. आणि सभोवताली कडेनी झाडे.. बरेचदा मी इथे येते तेव्हा क़्वचित एखादा कोणी फोनवर बोलत बसलेलं दिसतं.. बागेची कामं करणारे लोक कायम असतात.. आजही तिथे काही बायका गवत काढण्याचे काम करत होत्या.. झाडाखाली पायरीवर पाऊस लागत नव्हता म्हणून तिथे पावसाचा आनंद घेत बसले होते.. आणि बघता बघता पावसाचा जोर वाढला.. अन  मी भिजू लागले.. इन्फी मध्ये ठिकठिकाणी छत्र्या ठेवलेल्या असतात पण इथे पायऱ्यांवर छत्री कशी असेल.. त्या बायका लांब होत्या त्या लगेचच स्टेजमागच्या रूम जवळ गेल्या.. मी तिथे जाईपर्यंत पूर्ण भिजले असते असा पावसाचा जोर होता.. तेव्हढ्यात बागेतला एक माणूस छत्री घेऊन लांबून म्हणला, "madam ही छत्री घ्या.."  मी नको म्हणलं कारण ती छत्री ते मला द्यायला पुढे आले असते तर रूमपाशी जाईपर्यंत ते स्वतः भिजले असते.. ते जरी बागेतले कामगार असले तरी माणूसच आहेत, जसं पावसात भिजून माझे कपडे ओले झाले असते,मला सर्दी झाली असती तशी त्यानाही होण्याची शक्यता होती.. त्यांचं ते रुमपाशी जाऊन थांबले असते तरी त्यांना कोणी काही म्हणणार नव्हतं.. तरी ते त्यांच्या कामाचा एक भाग म्हणून मला छत्री द्यायला आले.. किती एकनिष्ठ होते ते त्यांच्या नोकरीशी.. त्याचा त्यांना पुरेसा मोबदला मिळत असेल का?

त्या दिवशी मला अगदी प्रकर्षाने  जाणवलं की हे बागेतले लोक सतत मन लावून  काहीना काही काम करत असतात,उन्ह असो वा पाऊस.. ऑफिसमध्ये काहीजण सतत फारश्या पुसत असतात, काचा पुसत असतात.. कॅन्टीन मधले लोक सकाळपासून रात्रीपर्यंत नाश्ता,जेवण ,साफसफाई यात गुंतलेले असतात.. आणि आम्ही संगणक अभियंता वातानुकुलीत ऑफिस मध्ये निवांत पणे काम करत असतो तेही खाणं पिणं अन गप्पा मारत.. तेही मनुष्य प्राणी आणि आपणही माणसंच.. मग ही फट कुठे तयार झाली?  याचं एकच उत्तर म्हणजे 'शिक्षण'.. नशिबाने आपल्याला योग्य शिक्षण मिळालं अन चांगली नोकरी मिळाली यामागे आपल्या पालकांचे आणि देवाचे आभार मानू  तेव्हढे  कमीच.. नाहीका..


They say.. "The purpose of education is to develop knowledge, skills and character. Knowledge makes all the difference. In this life everything perishes over a period of time. Whether it be beauty, diamond, gold or even land. Only one thing withstands destruction. It is Knowledge. The more you give, the more you get."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: