रविवार, ३ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३० : १४

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 14: 18th June,11


Nyalam -> Kathmandu


सकाळपासून खूप पाऊस होता इथे.. वातावरण पार बदलून गेले होते.. पावसाळ्यातला धो धो पाऊस पडत होता.. बरं झालं जाताना असा पाऊस नव्हता नाहीतर पारीक्रमा अवघड झाली असती असे सर्वानाच वाटत होते..  आता पुन्हा हिरव्यागार पर्वतांच्या रांगा दिसू लागल्या.. आणि आपल्या इथे लोणावळा खंडाळ्याच्या घाटात दिसतात तसे मनमोहक धबधबे दिसू लागले.. ते फारच वरून कोसळत ओटे त्यामुळे आवाजही खूप येत होता.. कुठे कुठे ढग खाली उतरले होते... कधी गाडी तपासासाठी थांबवली जायची मग आम्ही लगेचच फोटो काध्याला खाली उतरायचो..
दुपारी कोलारी येथे चीन-नेपाल बोर्डर पाशी आलो.. इथे जीप सोडली.. ड्रायवरला thank  u  म्हणले आणि त्याने छान smile दिले.. :)
आता checking  immigration  साठी भली मोठी रांग होती.. आमच्या जवळच श्रेष्ठा यात्रा कंपनीचे लोक रांगेत उभे होते.. असाच बोलता बोलता समजले कि ते आमच्या नंतर २ दिवसांनी आले होते आणि पहिल्या दिवसाच्या पुढे त्यांची परिक्रमा होऊ शकली नाही.. डोलमाला  जाता आले नाही त्यांना.. त्यांनी आम्हाला आमच्या यात्रेबद्दल सगळं विचारला आणि त्यांना फार वाईट वाटलं की इथपर्यंत लांब  येऊन यात्रा पूर्ण करता आली नाही.. काय करणार पण निसर्गासमोर मनुष्य दुबळा आहे..
आता सगळे आपापल्या घरी चालले आहेत अशी जाणीव सर्वांना होऊ लागली.. एकमेकांचे फोन नंबर, पत्ता वगैरे सगळे घेऊ लागले.. मला सगळे जण म्हणले लाडू खायला लवकर बोलव.. कोणी म्हणलं पत्रिका पाठव,आम्हीपण बघतो तुझ्यासाठी स्थळ .. मुलगी 'कैलासी' आहे,आपली पार्टी जड आहे!! मी बर म्हणलं पहा.. कोणी कैलास मानस यात्रेला जाऊन आले की त्यांना 'कैलासी' म्हणतात म्हणे..
मग पुन्हा मैत्री पुलावरून चालत जाऊन चीन मधून नेपाल मध्ये आलो.. नेपाळ मध्ये आल्यावर जरा आपल्या भागात आल्यासारखे वाटू लागले.. इथे जेवणासाठी थांबलो.. तिथे लगेचच currency  exchange  वाला आला.. नंतर मग बसने काठमांडूच्या दिशेने प्रवास सुरु झालं.. हा प्रवास साधारण ६ तासाचा होता.. बाहेर पाऊस, धबधबे,नदी ,ढग आणि बस मध्ये मजा मजा चालू होती सर्वांची.. अशारितीने आम्ही संध्याकाळी काठमांडूच्या वैशाली हॉटेल मध्ये पोहचलो.. तिथे abc  adv चे ईश्वर सर सर्वांच स्वागत करायला उभे होते..
तब्बल ११ दिवसांनी आज गरम पाण्यात अंघोळ केल्यावर किती मस्त वाटतं ते मला विचारा.. तरीही मी जरा जपूनच बाथरूम मध्ये गेले.. एकदा आपटून झाल्याने त्या टबची  भीती मनात बसली होती.. :)
राजू भय्या आणि त्यांचे मित्र उद्या सकाळी लवकर निघणार होते.. म्हणून मग त्यांनी पत्ता  वगैरे दिला.. आणि मला आठवण म्हणून कैलास मानसचे मोठे पोस्टर भेट म्हणून दिले.. :) औरंगाबादचा एक ग्रुप होता तेही उद्या सकाळी निघणार होते.. त्यांच्यात एक डॉक्टर काका होते.. ते मला येऊन म्हणले की कैलास मानस चे दर्शन आई वडिलांच्या पुण्यायीमुळे मिळते, आई वडिलांना कधीही विसरू नकोस.. मी बर म्हणलं.. मी कशी विसरेन माझ्या आई बाबांना.. ते आहेत म्हणून तर मी आहे..
आईला हे टब प्रकरण, कॅमेरा प्रकरण अशा गोष्टी आज फोन करून सांगितल्या..  जेवताना भीम भय्याला म्हणलं इथे जवळपास कुठे पाणीपुरी मिळते का.. एकतर परिक्रमेचा  आनंद साजरा करयचा होता आणि १२ गावची पाणीपुरी खायचा माझा नित्यनेम.. ते म्हणले उद्या जाता येईल पण उद्या तर माझा उपास,गणेश चतुर्थी.. जाऊदे म्हणलं आता पुण्यात जाऊनच पाणीपुरी खावी.. २ days to go ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: