सोमवार, २५ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३३

"एकाच या जन्मी जणू.. फिरुनी नवी जन्मेन मी.." :)


नुकताच वाढदिवस झाला आणि पुन्हा एक नवीन आयुष्य सुरु झालं..  जाता जाता मन एकदा भूतकाळात फिरून आलं..  त्या गतकाळातील अनुभवांवरून मिळालेले धडे  इथे नमूद करत आहे..


कधी कधी आपण कोणाला जवळचं मानून त्यांच्यासाठी काही खास करतो..  आणि कालांतराने ते लोक सगळं विसरून जातात, आपल्यासाठी ते काहीही करत नाही.. आशावेळेस आपणच दुखी होतो.
खरतर आपण प्रेमाखातर त्यांच्यासाठी मनापासून काही केलं असतं इथेच आपलं कर्तव्य सपंतं.. ते किंमत ठेवत नाही ही अडचण त्यांची आहे.. याबाबतीत गंभीर त्यानी व्हायला पाहिजे.. आपण आपल्यापरीने सगळं करून पुन्हा आपणच वाईट वाटून का घ्यायचं..


बरेचदा असं जणवतं की काहीजण आपला ठराविक वेळेपुरता काही कारणासाठी एखाद्या वस्तुप्रमाणे वापर करतात आणि नंतर सोडून देतात.. मग आपणास वाईट वाटतं..
या बाबतीत आपण निश्चिंत राहायला पाहिजे.. आपला उपयोग केला गेला असेल तर आपण कोणाच्यातरी कामी आलो म्हणून आनंदी राहायला पाहिजे आणि  अशा व्यक्तीला गरज पडेल तेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात पुन्हा येतेच.. आणि नाहीच आली तर ती व्यक्ती मजेत आहे हे समजून आपण शांत आनंदी व्हायला पाहिजे..


काही वेळा आपल्या आसपासचे लोक कोणत्या न  कोणत्या कारणांनी भेदभाव करून आपल्याला कमी लेखतात.. तेव्हा आपला आत्मविश्वास कमी होऊन आपण खचतो..
खरतर समोरचा आपल्याला कमी लेखणारा,आपल्याकडे दुर्लक्ष करणारा माणूस म्हणजे काही अख्ख जग नसतं.. अशा वेळेस आपल्या मनाची अन् बुद्धीची दृष्टी विशाल केली की समजतं की आपण जसे आहोत तसे खूप काही करू शकतो.. जगात कित्येकांना आपण हवे आहोत..


या व्यवहारी जगात सरळ साधेपणा.. प्रामाणिकपणा.. सवेंदनशीलता.. मोकळेपणा.. या गोष्टीना कमजोर समजले जाते..
परंतु याच मूल्यांमुळे माणुसकी नावाची गोष्ट जिवंत राहते.. आणि कुठेतरी तो सगळं पहात असतो त्यामुळे आज ना उद्या योग्य न्याय नक्कीच मिळतो..


आपण नेहमी दुसऱ्यांच्या चुकांवर रागावतो आणि स्वतःच्या चुकांनी हळहळतो..
खरतर कोणीच परिपूर्ण नसतं .. त्यामुळे मनात काही न ठेवता स्वतःला आणि इतरांना मोठ्या मनाने माफ केला तर मन हलकं होतं.. असे केल्यास आपण  खऱ्या अर्थाने स्वतंत्र अन् मोकळे होतो..


आणि सर्वात महत्वाची शिकवण.. भगवदगीतेत म्हणले आहे जसे..

उथ्धरेथ आत्मनात्मानं नात्मानम अवसाथयेत!
आत्मैव हय आत्मनॊ बन्धुर आत्मैव रिपुर आत्मनः!!

"One must deliver himself with the help of his mind and not degrade himself..  You are your Best Friend & You can become your Own Enemy too!!! "




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: