बुधवार, २२ जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : १

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव 
 
Day 1: 5th June,11

Pune -> Mumbai -> Kathmandu

किती दिवसापासून वाट बघत होते ती वेळ जवळ येत होती.. सकाळी ८ ची flight मुंबईहून पकडायची  होती.. ब्याग भरून रात्री ११ वाजता झोपून गेले होते.. १२ वाजता बाबांनी उठवला तेव्हा खरंतर कुठे जायचं आहे हे पूर्णपणे विसरून गेले होते.. पटकन फ्रेश झाले तोपर्यंत गाडी दारात आली.. बाबा विमानतळावर येत होतेच.. गाडीत  बसल्यावर आईला म्हणलं माझी अजिबात काळजी करू नकोस,जिथून शक्य आहे तिथून फोन करत राहीन मी.. :-)
कारवा काका आणि लोहगावकर काकूंची ओळख आधीच मीटिंग मध्ये झाली होती.. थोड्याफार गप्पा झाल्या..  लगेचच express wayवर एका पंपावर गाडी थांबवली.. ग्यास भरायचा होता तर ती वायर नेमकी तेव्हा ड्रायवर काढून तुटली गेली.. थोडावेळ त्याने फोनाफोनी केल्यावर पेट्रोल भरून गाडी पळू लागली.. रात्रीचा प्रवास, त्याला आधीच पाहता आला नाहीका हे असा विचार मनात येऊन गेलाच.. कारवा काकांच्या ओळखीची गाडी असल्याने आम्ही kk ऐवजी या गाडीने निघालो होतो..
ट्रिपचा उत्साह असल्याने झोप बिलकुल येत नव्हती.. इकडे तिकडे पाहत बोलत प्रवास चालू होता तोच वाशीच्या अलीकडे गाडी चक्क बंद पडली.. तो ड्रायवर इतका बिनधास्त होताना माझी चिडचिड झाली.. बर कारवा काका तर काहीच म्हणले नाही त्याला.. त्याचा काहीतरी फोनाफोनी चालू होती.. माझे बाबा वेळेच्या बाबतीत फार कडक शिस्तप्रिय आहेत.. त्यांनी काही म्हणायच्या आधी मी म्हणलं आपण दुसरी taxi करून जाऊया नाहीतर उशीर होईल.. काकुपण तेच म्हणल्या.. नशिबाने आम्ही टोलनाक्याजवळ होतो.. त्यामुळे लगेच taxi मिळाली आणि आम्ही वेळेत विमानतळावर पोहचलो.. इतक्या रात्री जर ती गाडी express way वर बंद पडली असती तर पुढे कसं काय झालं असतं या विचाराने आम्हाला कसेतरी झाले..
पुण्याहून येणारे ८/१० मंडळी सगळे पाहते ५ वाजता विमानतळावर हजर झाले.. मुंबईकर ६ नंतर जमू लागले.. सचिन travels च्या महेशने सर्वाना तिकिट्स आणि बाकीच्या गोष्टी देऊन सूचना दिल्या.. बाबापण असं कर तसं कर सांगत होते.. अशा रीतीने आत जायची वेळ झाली..
खरं सांगायचं म्हणजे इतके दिवस एव्हढी भटकंती करून देखील विमानाने प्रवास करायची ही माझी पहिलीच वेळ त्यामुळे मी फारच उत्सुक होते.. बोर्डिंगच्या इथे सीट नंबर देतात्ना मी म्हणलं मला window seat मिळेल का तर तिथल्या मुलीने एक गोड  smile दिलं,बास.. checking, immigration झाल्यावर पुष्कळ वेळ होता तेव्हा मी विमानतळ पाहून घेत होते.. आजूबाजूला सचिन चे लोक होते पण अजून कोणाशी विशेष ओळख झाली नव्हती.. शेवटी एकदाचं विमानात आत गेले आणि खिडकीची जागा बघून जाम खुश झाले.. मी एकटीच होते या गोष्टींची मला बिलकुल खंत नव्हती.. उलटं मी प्रत्येक अन प्रत्येक क्षण मनापासून जगत होते.. विमान जेव्हा आकाशात उडू लागलं तेव्हा मी एखाद्या लहान मुलाला जसा आनंद होईल तशी आनंदी झाले होते.. मुंबई सोडताना खाली अफाट समुद्राचे दर्शन झाले.. पुढे मग कधी ढगातून तर कधी स्वच्छ आभाळातून झेप चालू होती.. ढगांचे रूप पाहून वाटलं 'काळा काळा कापूस पिंजला रे' ही कल्पना अशा विमानप्रवासातच सुचली असणार..  समोर स्क्रीनवर सविस्तर मार्ग वगैरे पाहता येत होता..  आणि सगळ्यात best part म्हणजे जुन्या हिंदी मराठी गीतांचे, गझलांचे सुंदर collection होते .. गाणी ऐकत बाहेरचा निसर्ग अनुभव घेत होते.. बाकी  air hostess खायचं प्यायचं  देऊन सतत busy ठेवत होत्या..  नेपाळमध्ये प्रवेश होताच जमिनीचा भाग कमी होऊन हिरवेगार हिमालयाच्या रांगा दिसू लागल्या आणि मन अजूनच प्रसन्न झालं..
३ तासाच्या प्रवासानंतर साधारण ११ वाजता आम्ही काठमांडूला पोहचलो.. इथली वेळ भारतापेक्षा 15min  पुढे आहे.. विमानतळावर ABC adventure चे भीम भय्या, दीपक दा सर्वांचं स्वागत करायला आले होते.. इथे यात्रेकरूंचा हर घालून स्वागत केले जाते म्हणे.. त्यांनतर बसमधून आमची रवानगी काठमांडू च्या हॉटेल वैशालीमध्ये झाली..  महेशने सर्वाना एकत्र जमवून माहिती दिली आणि प्रत्येकाला rooms दिल्या गेल्या.. मी एकटीच असल्याने कल्पना काकू ज्या एकट्या आल्या होत्या त्यांच्यासोबत मला room मिळाली..
रात्रभर जागरण झालं होता त्यामुळे अंघोळ करून ताजे तवाने  व्हावे असं मी ठरवलं.. आणि काही कळायच्या आत बाथरूम मध्ये टबात जोरात आपटले.. धरायला काहीच मिळाला नाही त्यामुळे अगदी पूर्णपणे पडले.. पडल्यावर थोडावेळ काय होतंय ते काहीच कळलं नाही.. नंतर उठायचा प्रयत्न केला तेव्हा उजव्या हातात आणि डोक्याच्या मागच्या भागातून जोरात कळ उठली.. बास, चला आता थेट पुणे  गाठावं लागणार मला असं वाटू लागलं.. आई आई करत होते पण इथे जवळ आई नव्हती.. नंतर मनात 'ओम नम: शिवाय' म्हणले,मला पुढची यात्रा करायची आहे असे म्हणले.. आणि कशीतरी उठून बाहेर आले.. मग moov, spray, combiflame शक्य तेव्ह्ढ सगळं काही घेतलं.. जेवण करायला गेले तेव्हा माझी बातमी सर्वत्र पसरली होती.. आमच्या ग्रुपमध्ये २ डॉक्टर लोक होते त्यांनी हात बघितला, शिरा दाबून बघितल्या.. हे कर ते कर सांगितलं..  जेवणानंतर मात्र लगेचच  मी झोपेच्या अधीन झाले..  संध्याकाळी मीटिंग होती तेव्हा खरतर हात दुखत होता पण मी तिकडे जास्त लक्ष द्यायचं नाही असं ठरवून टाकलं होतं..
सचिनचे ३५ आणि सिमास चे १५ असे मिळून आम्ही ५० लोक आता ABC Adventure च्या ताब्यात होतो.. इथून पुढे सगळा  control ABC adventure यांचा होता.. सिमास चे चेअरमन केळकर काका यांच्याशी पुढे माझं चांगला जमला.. त्यांनी अगदी स्वतःच्या मुलीसारखी माझी काळजी घेतली अगदी शेवटपर्यंत..  मीटिंग मध्ये ईश्वर सरांनी आम्हाला पुढच्या प्रवासाची, सोयींची अगदी सविस्तर माहिती दिली.. पुढे कुठे कशी काय काय काळजी घायची नीट समजावून सांगितले.. वाटते तितकी सोपी नाही आणि तेव्हढी कठीण सुधा नाही अशी ही यात्रा कायम +ve approach ठेवला तर नीट पार पडते असे त्यांनी सांगितले..
अशा रीतीने पहिला दिवस बराच मोठा आणि महत्वाचा असा होता.. पुढे सगळं कसं  काय काय होईल असा विचार करत मी गाढ झोपून गेले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: