रविवार, २९ मे, २०११

मंतरलेले दिवस - २९

आज नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आले,मेल्स बघून स्वारी नाश्त्याला निघाली.. पण रोजसारखा सकाळचा उत्साही मूड नव्हता.. बोलता बोलता मैत्रीणीना म्हणलं आज सकाळी सकळी आईशी भांडण झालं.. डब्यावरून..

माझ्या नेहमीच्या डब्या ऐवजी आईने इतका मोठा डबा दिला होता तो माझ्या पर्स मध्ये कसा मावेल आणि मला हातात डब्यासाठी अजून दुसरी पिशवी  घ्यायला आवडत नाही.. आई म्हणली तुला आणि तुझ्या मैत्रीणीना दहीभात आवडतो ना म्हणून जास्त दिलाय,जेव्हढा पाहिजे तेव्हढा घेऊन जा.. मग थोडी चिडचिड करत मी वेगळ्या पिशवीत डबा घेऊन आले.. ऑफिस मध्ये आल्यापासून सारखं वाटत होतं की मी आईशी असं भांडायला नको होता.. मैत्रिणी म्हणल्या त्यांचंही आईशी असं बरेचदा भांडण होतं.. तरीपण माझं लक्ष कुठे लागेना..

घरी  फोन करावा म्हणलं तर परत डबा प्रकरण नको वाटलं.. तेव्हढ्यात आमच्या प्रोजेक्टला  client appreciation mail आला.. मग ही बातमी सांगण्याचं निम्मित्त काढून आईशी बोलले.. दुपारी जेवताना दहीभाताचा पहिला घास खाल्ला आणि डोळ्यात टचकन पाणी आलं.. कितीही  पैसे मोजेले तरी कुठे हॉटेल मध्ये मिळणार नाही अशी चव होती दहीभाताची.. मला सगळं मिळतंय ना म्हणून किंमत नाही असं अगदी मनापासून वाटलं.. लगेच आईला फोन करून सांगितलं  दहीभात आवडला म्हणून..

असं खुपदा होतं.. आई बाबा सर्वात जवळचे आणि हक्काचे म्हणून बरेचदा त्यांच्यावर राग काढला जातो, त्यांच्यापाशी नाही नाही ते हट्ट केले जातात..  पण मग वाटतं आई बाबा नाही तर कोण समजून घेणार आपल्याला.. त्यांच्यापाशी नाहीतर कोणापाशी हट्ट करणार?  आपल्या आयुष्यात आई बाबां इतकं प्रेम दुसरं कोणीच नाही करू शकत.. माझं लग्न नाही झालं, माहिती नाही कदाचित life partner कडून तेव्हढ प्रेम मिळत असावं पण आई बाबांच्या मायेला कशाचीच सर येऊ शकत नाही असं मला वाटतं..

ये तो सच है के भगवान है..  है मगर फिर भी अन्जान है..

धरती पे रूप माँ बाप का .. उस विधाता की पहचान है!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: