रविवार, २६ जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : ५

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 5: 9th June,11


Nyalam
  (3750 mt.)
आज पहाटे  ४.३० वाजता जाग आली.. बाहेर आले, जरा फ्रेश वाटत होते आणि आता डोकं शांत झालं होतं.... न्यालम किती सुंदर आहे हे आता कळत होतं.. इथल्या वातावरणाशी, उंचीशी समरस होण्यासाठी आज इथेच मुक्काम करायचा होता..
चहा नाश्ता झाल्यावर आम्ही सर्व  सरावासाठी मागच्या डोंगरावर निघालो,practice trek.. हिमालयातला ट्रेक.. तिथे पुण्यातही ट्रेक्स सुरु झाले असणार आता असं वाटून सह्याद्रीच्या ट्रेक्सची आठवण झाली..
सभोवताली जिथे पाहावं तिथे उंचच उंच पर्वत रांगा आणि ढगाळ हवामान.. डोंगर विशेष कठीण नव्हता पण थंड गार वारा जोरात वहात होता.. डोंगरावर बारीक हिरवळ पसरली होती आणि अगदी छोटी छोटी फुले.. उगाच फुलांना हात लावू नका असे आम्हाला सांगण्यात आले कारण कधी कधी त्या फुलांची allergy होऊ शकते..
कालची गळून गेलेली वृंदा आज उत्साहाने चालत होती याचं  मलाच थोडसं आश्चर्य वाटलं.. काळ रात्री वाटत होतं पुढे परिक्रमा कशी करणार आणि आता वाटत होतं सगळं नीट जमेल मला.. :) थोडा अशक्तपणा जाणवत होता सर्वाना म्हणून ग्लुकोज, इलेक्ट्रोल घेणं चालू होतं.. पूर्ण वरती जाईपर्यंत थेंब थेंब पाऊस सुरु झाला म्हणून आम्ही लागलीच परतलो..
एव्हाना ग्रुपमध्ये पुण्याहून एक मुलगी एकटीच आली आहे ही बातमी पसरली होती.. प्रत्येकजण जाता येत मला थांबवून माझ्या बद्दल माहिती विचारायचे.. काय करतेस, एकटी कशी काय आलीस, घरी कोण कोण असतं etc.. कोणत्या कॉलेज मध्ये आहेस असा प्रश्न कोणी विचारला कि इतकं  मस्त वाटायचं, अजून मी कॉलेज कुमारी वाटते तर.. हाहाहा..  पुण्याच्या लोकांनी माझ्या नावाने जरा अभिमान बाळगला, पुण्याची पोरगी शोभातेस हो वगैरे.. अख्या ट्रीपमध्ये काका लोकांनी माझे खूप लाड केले आणि काकू लोकांना मी शक्य तेव्हढी मदत करायचे प्रयत्न केले.. आमच्या ग्रुप मध्ये डॉक्टर, अभियंता, शिक्षक, बँकवाले असे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी होती.. art of living चेही एक काका भेटले.. कोणी बहिणी बहिणी आल्या होत्या, कोणी मित्र मैत्रिणी आले होते, कोणी आई मुलगा आले होते, कोणी नवरा बायको, तर कोणी एकटे आले होते.... जवळ जवळ सगळ्यांनी बऱ्यापैकी भारत बघितला होता.. अमरनाथला अजून गेली नाहीस का तू  असे सर्वजण मला म्हणले.. पुढच्या वर्षी जाईन म्हणलं.. :-)
इथे १५ दिवस खाण्यापिण्याची चंगळ होती.. अख्या ट्रीपमध्ये कुठेही असलोतरी आम्ही जवळजवळ रोज ४ च्या आसपास wake-up  call दिला की उठायचो.. सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी बाहेर ठेवलेलं असायचं.. दात घासायचे,फ्रेश व्हायचं.. लगेच पिण्यासाठी गरम पाणी, चहा, कॉफी , दुध वगैरे तयार..  ५.३० ला लगेच नाश्ता.. भूक लागली आहे का वगैरे असा विचार इथे आल्यापासून करायचाच नव्हता..  रोज नाश्त्यामध्ये एक गरम गरम पौष्टिक खीर, च्यवनप्राश, ब्रेड जाम, cornflakes वगैरे असायचे.. थंडीत गरम खीर एक नंबर वाटायची..  दुपारी १२/१ वाजता प्रवासात असलो तरी मध्ये कुठेतरी थांबून जेवण.. जेवणाआधी रोज जूस दिला जायचा तो गरम पाण्यातला.. :) जेवायला फुलके,२ भाज्या , दाल भात आणि रोज एक फ्रुट असायचेच..  ४ वाजता चहा.. ६ वाजता रोज वेगवेगळ्या प्रकारचे सूप.. ७.३०  वाजता लगेच रात्रीचे जेवण..रात्रीच्या जेवणानंतर  diamox गोळी घायची असायची म्हणून hot chocolate ..  जेवताना एखादा पदार्थ घेतला नाही किवा कमी घेतला कि ते शेरपालोक म्हणयचे बेन खाना ठीकसे खालो.. त्याचं सर्वांकडे नीट लक्ष असायचं,प्रेमाने विचारपूस करायचे ते.. एव्हढं करूनही लोकांच्या इतक्या demands  असायच्या तरी हे लोक १५ दिवसात कधीच कोणावर चिडले नाही, आवाज वर करून कोणाशी कधीच बोलले नाही याचं फार कौतुक वाटतं मला..  १५ दिवसात कडकडून भूक कधी लागलीच नाही.. भूक लागायच्या  आत खाण्यासाठी काहीतरी पुढे यायचे.. आणि कदाचित थंडीमुळे.. पोट साफ न होणं हा त्रास मात्र सर्वांनाच पूर्ण ट्रीप मध्ये होत होता.. ओवा खाणे वागिरे चालू होते.. मी या बारक्या सारक्या गोष्टी  इथे मुद्दाऊन नमूद  करत आहे,ज्यांना पुढे ही यात्रा करायची आहे  त्यांना कल्पना असावी म्हणून बाकी काही नाही..
संध्याकाळी पुन्हा आम्ही महिला मंडळ फिरून आलो.. खरंतर हे दिवस अगदी स्वप्नातले होते जणू.. पर्वतांच्या  कुशीत,सततचा नदीच आवाज ऐकत कसलीही दुसरी काळजी विचार न करता मनसोक्त फिरायचं..बास..

२ टिप्पण्या:

Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले...

कोणत्या कॉलेज मध्ये आहेस? म्हणजे शिकवायला गं? ;-)

वृंदाली.. म्हणाले...

actually mi roj shalet jate.. :P