रविवार, २६ जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : ६

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 6: 10th June,11


Nyalam 
to Saga (4450 Mt)
ठरल्याप्रमाणे सगळे ७ला आवरून नाश्ता करून पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाले.. काठमांडू सोडल्यापासून आता पुढे काही दिवस अंघोळ प्रकरण विसरायचे होते.. याबद्दल मी नंतर सांगेनच.. :)
आता प्रवास सुरु झाला.. मलाना actual destination हून जास्त तिथे जाताना लागणारा प्रवास फार आवडतो.. इकडे तिकडे बघत फक्त पुढे जात राहायचे,बास.. या सुंदर प्रवासात मला क्षणभर सुधा झोप लागत नाही.. ना कोणाशी गप्पा माराव्या वाटतात.. माझ्यामाझ्यात मी कुठेतरी हरवून जाते अशावेळेस.. त्यामुळे एकटी असल्याचा काहीच फरक पडत नाही मला.. :)
आता पाहावं तिथे दूरवर राखाडी पर्वत रांगा दिसत होत्या.. इथले चीनी ड्रायवर थोडी गाडी चालवली कि लगेच ब्रेक घ्यायचे.. सारखा धुम्रपान लागतं त्यांना.. ते त्यासाठी थांबले कि मी लगेच फोटो काढण्यासाठी बाहेर यायचे.. पण कुठे कुठे बाहेरची थंडी सहन व्हायची नाही.. सगळा सौदर्य गाडीत बसूनच पाहता यायचं.. १२ वाजता एकेठिकाणी जेवणासाठी थांबलो तिथून समोर संदर हिमशिखरे दिसत होती.. एका शिखरावर सिद्धिविनायकाचा चेहरा दिसतो असे म्हणतात.. साध्या डोळ्यांनी मलातर काही दिसत नव्हता.. मग एकाचा शुटींग चा कॅमेरा होता त्यातून एकदम झूम करून पहिले तेव्हा अगदी  गणपतीचे रूप दिसले.. :) नंतर फोटो काढायचा थोडाफार प्रयत्न केला.. घरी शुटींगचा कॅमेरा असताना मी इथे आणला नव्हता.. मी एकटी फोटो काढणार का ते शुटींग घेणार आणि शिवाय तो कॅमेरा बराच मोठा, एकटीला इतकं सांभाळता आले नसते म्हणून नाही आणला.. पुढे गेल्यावर एक सुंदर निळेशार सरोवर दिसले.. ते बघून वाटलं की  हे सरोवर इतकं मनमोहक आहे तर मानस सरोवर तर किती सुरेख असेल..
आतापर्यंतच रस्ता चांगला होता.. आता इथून पुढे कच्चा रस्ता होता.. काही ठिकाणी मागे वळून पुन्हा दुसरा रस्ता पकडावा लागत होता.. सगळीकडे नुसती धूळ उडत होती.. त्या धुळीत कित्येकदा पुढचा काही दिसेनासं व्हायचं.. पण हे ड्रायवर भारी होते,त्यांना मानलं पाहिजे.. कुठेच कधीच कोणालाही काही प्रॉब्लेम आला नाही.. आणि कधी अवघड वळण उंचवटा  पार पडला कि ते ड्रायवर जाम खुश व्हायचे.. ते त्यांचा जॉब मस्त एन्जॉय करत होते.. 
पुढे एके ठिकाणी आमच्या २ गाड्या आल्या नाही म्हणून बाकी सगळ्या गाड्या थांबवल्या होत्या.. तिथे ऊजवळच बर्फाने गोठलेलं एक सरोवर होतं.. जवळ जवळ २ तास तिथे वाट बघत आम्ही निसर्गाचा आनंद घेतला.. पण नंतर थोडी काळजी वाटू लागली.. त्या धुळीच्या रस्त्यात कोणी रस्ता हरवला तर कठीण होते.. आणि शोधायला तरी कुठे जायचं.. अंधार पडलं तर संपलंच.. त्या गाडीत कोण कोण आहे यावर चर्चा सुरु झालो.. चीनी ड्रायवर  लोकांना इंग्रजी बोलता येत नव्हतं.. त्यांना काही सांगायचा असल्यास खाणाखुणांनी सांगावं लागायचं.. नंतर कळला कि त्या २ गाड्या आधीच पुढे गेल्या आहेत आणि मग सगळ्यांच्या जीवात जीव आला..
संध्याकाळी सगळा पोहचलो.. आता आम्ही पुढच्या उंचीच्या टप्प्यावर आली होतो पण गोळ्या घेतल्यामुळे इथे उंचीचा त्रास झाला नाही.. हे गाव सुंदर होतं, आजूबाजूला वाळवांट  पसरलेलं दिसत होतं.. चीन आपल्यापेक्षा अडीच तासाने पुढे असल्याने कि काय पण इथे दररोज आम्ही ९ वाजता झोपायला जायचो.. आणि रोज नवनवीन जागेत झोपत असलो तरी झोप कधी लागलीच नाही असा मला कधी झालं नाही.. रोज झोपताना एक प्रकारचं समाधान आणि उद्या काय कसं घडेल अशी उत्सुकता मनात असायची..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: