शनिवार, १६ ऑक्टोबर, २०१०

हरवलं आहे..


फुलांचा रन्ग.. हवेतला सुगन्ध..

निखळ आनंद.. हरवला आहे…

आशेची किरणे.. पोर्णिमेचे चांदणे..

मन्सोक्त हसणे.. हरवले आहे…

पावसाच्या धरा.. लाटांचा किनारा..

भावनांचा झरा.. हरवला आहे..

हे असं ते तसं.. सगळं आहे जसंच्या तसं…

तेव्हडं मन माझं कसं.. हरवलं आहे… !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: