शनिवार, ३१ मार्च, २०१२

मंतरलेले दिवस - ५९ : भाग 2

आग्रा,सिटी ऑफ ताज.. :)

काल अख्खा दिवस प्रवास करून आम्ही  आज सकाळी १० वाजता आग्रा छावणी स्टेशनला पोहचलो.. आधी मुलीमुलींचा प्लान होता त्यामुळे सुरक्षित म्हणून केळ्कर काकान्च्या तर्फे गाडी- हॉटेल सगळे आधीच नीट बुक करून ठेवले होते.. त्यामुळे यावेळेस प्रथमच माझ्या नावाची पाटी घेऊन कोणी उभे होते, तो आमचा तीन दिवसाचा ड्रायवर होता..  :)

ड्रायवरला तीन दिवसाचा प्लान सांगितला.. परीक्रमा चालत करणार म्हनला तर तो फार आश्चर्यचकित झाला, 'आपसे नाही होगा,गाडीसे करलो' असा तो मला सारखा म्हणत होता.. मला हा मागेही असा अनुभव आला होता..
गाडीमधून आग्रा दर्शन करत हॉटेलपाशी आलो.. ताज माहालच्या परिसरात (३००मी) असलेले ताज खिमा हॉटेल यूपी गाव्हरमेन्टचे आहे.. कॅम्पस अतिशय सुंदर.. चेकीनला जरा वेळ होता तेव्हा मी थोडं फिरून आले.. तेव्हा तिथून ताजचे अतिशय सुंदर दूरदर्शन झाले..

सगळं अवरून आम्ही लगेचच बाहेर पडलो.. आज शुक्रवार असल्याने ताजमहाल बंद असतो..  शुक्रवारी तिकडे आतमध्ये लोकं नमाज पडायचे म्हणून कोर्टाने हा निर्णय घेतला.. म्हणून आज आम्ही आग्रा किल्ला आणि फतेहपुर सिकरी पाहायचे ठरले.. दुपारचे उन्ह होते पण पुण्यात आता जितका उन्हाळा वाढला आहे तितकी तीव्रता इथे भासली नाही.. सकल संध्याकाळ तर एकदम आल्हाददायक हवा होती..  प्रथम आम्ही आग्र्याहून ५०किमी वर असनाराया फतेहपुर सिकरीला गेलो, अकबरची राजधानी पाहायला... इथे पाण्याची कमतरता होती म्हणून आग्रा किल्ल्याला स्थलांतर झाले होते म्हणे.. तिथेले वसतुशिल्प अप्रतिम आहे..  त्याकाळाच्या भव्या प्रसदांचे अवशेष अजूनही आहे.. तेथील बुलंद दरवाजा , दर्गा वगैरे अजूनही चांगल्या स्थितीत ठेवले आहे.. आणि सगळ्यात भारी म्हणजे बाहेर उन्ह असले तरी आत इतके थंड वाटत होते.. तिथे मुसलमान लोकं जास्त होती..

पण तिथे गाइड आणि काहीतरी विकणारे लोकं फारच त्रास देतात असा अनुभव आला.. अगदी मागेच लागत होते,लहान मुले तर इतकी होती त्यांना धड ओरडानेही नको वाटत होते तरी शेवटी जरा मोठ्या आवाजात सांगवेच लागायचे.. या प्रकारामुळे थोडे वैतागून गेलो होतो..

नंतर आम्ही आग्रा फोर्ट पाहायला गेलो.. तिथे जाताच किल्ल्याच्या बाहेर मोठ्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून मराठी मन भरून आले.. त्या पुतळ्याच्या इथे मराठीमधे महाराजांची आग्र्याहून सुटका याबद्दल माहिती लिहिली होती.. मला वाटले ते हिंदी इंग्रजी मध्ये लिहायला पाहिजे होते म्हणजे तिथे येणार्‍या सर्व लोकांना माहिती समजली असती.. असो.

आम्हाला हा आग्रा किल्ला फारच आवडला.. दिल्लीच्या लाल किल्ल्यापेक्षा कितीतरी पटीने भव्य.. इतक्या मोठ्या किल्ल्यातून महाराजांनी कशी काय सुटका करून घेतली असेल याचे नवल वाटले..  दिवाणे आम -खास मस्त आहेत.. जोधा-अकबरचे शूटिंग तिथेच झाले असावे असे वाटले.. तिथले नक्षीदार पेण्टिण्ग्स सुंदर आहेत.. आणि इथे एका पॉइण्टअरुण यमुना नदीच्या काठावर असलेल्या ताजमहालचे विहंगाम दृष्य दिसते.. संध्याकाळी येथे आल्यामुळे अधिकच आनंद घेता आला. . इथे माकडान्चा मात्र सुळसुळाट होता..

नंतर आग्रा मार्केट मध्ये जरावेळ फिरलो तिथले लेतर  प्रसिद्ध आहे म्हणून  मग थोडीफार शॉपिंग केली.. आता मथुरा वृंदावन गोवर्धनला जायचे वेध लागले होते,म्हणून उद्या सकाळी लवकर निघायचे ठरले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: