बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ४७

Being emotional is not a weakness!

एका ट्रेकची गोष्ट.. गड उतरताना आम्ही थोडे जण संध्याकाळी सहा वाजता पायथ्याशी पोहचलो होतो.. ट्रेकचा एक आयोजक मित्र आम्हाला म्हणला
"तुम्ही गाडीपाशी जाऊन थांबा मी बाकीचे आले की तिथे येईन".. त्याप्रमाणे आम्ही ३ मुली , एक मुलगा आणि गाडीचा ड्रायवर गाडीपाशी येऊन थांबलो..  ६ वाजले, ७ वाजले अगदी ८ वाजत आले तरी गटापैकी बाकीचे कोणीही गाडीपाशी आले नाही.. आधी आम्ही शांतपणे वाट बघत होतो पण नंतर मात्र मला अस्वस्थ वाटू लागले.. इतका वेळ कसा झाला, नक्की काय झालंय तिकडे असे विचार मनात येऊ लागले..  मग मी बाकीच्यांना म्हणले, त्यांच्याकडे टोर्च असेल का,किती अंधार पडलाय, आपण कमीतकमी पायथ्याशी जिथे काहीजण थांबले आहेत तिथेपर्यंत तरी जाऊ म्हणजे काय झालंय ते समजेल.. शेवटी तो ड्रायवर आणि मी पायथ्यापाशी निघालो.. १५/२० मिनिटांचा रस्ता होता खरंतर.. पण पूर्ण झाडी अन कर्र काळोख होता.. दूरवर काजवे चमकताना दिसायचे तेव्हा तिथून कोणीतरी येतंय असं वाटायचं.. त्या छोट्या पायवाटेवर आमच्याशिवाय कोणीच नव्हतं..  ड्रायवर अनोळखी अन हि जगही अपरिचित,सुनसान या गोष्टीचं भान मला होतं..  म्हणून मी एका हातात ट्रेकची काठी आणि दुसर्या हातात टोर्च घेऊन अगदी काही झालंच तर प्रतिकार करायला सज्ज होते.. शिवाय ग्रुपमधल्या मित्रामैत्रीनिना मोठओमोठ्यांदा हाक मारत चालत होते.. अशारीतीने आम्ही पायथ्याशी पोहचलो आणि उशीर व्हायचं कारण समजलं.. सगळे सुखरूप खाली आल्यावर जीवात जीव आला..

दुसऱ्या दिवशी ट्रेकपैकी एका मैत्रिणीचा मेल आला,खास मला झापायला.. ती माझ्याबरोबर गाडीपाशी थांबली होती.. तिला मी ड्रायवर बरोबर गेलेले अजिबात पटले नाही.. तिने मला बरंच सुनावलं.. त्या ड्रायवरने काही केले असते तर वगैरे वगैरे.. त्या दिवशी मला वाटलं की माझ्या हातून फार मोठा गुन्हा घडलाय.. मान्य आहे की काळजी वाटली म्हणून ती मला असं बोलली.. पण ती वेळच अशी होती की मला ट्रेकच्या बाकी मंडळींचं काय झालं या विचाराने राहवलं गेलं नाही..  खरंतर ट्रेकचे अनुभवी आयोजक तिकडे होते त्यामुळे त्यांनी सगळी नीट काळजी घेतली असेल हे मला माहिती होतं पण तरीही त्यांची एक मैत्रीण म्हणून मी भावनावश झाले आणि पायथ्यापाशी एकटी ड्रायवर सोबत आले.. या गोष्टीवर ट्रेकर्स मित्र मला रागावले असतील अस वाटलं कारण त्यांच्यावर माझी जबाबदारी होती..   नंतर बरीच मेलामेली झाली.. मी तिची अन ट्रेकर्स मित्रांची माफी मागितली.. मग तिनेही मला वाईट वाटलं म्हणून माफी मागितली.. आणि नंतर ती गोष्ट आम्ही विसरून गेलो..


आता परवाच आम्ही मैत्रिणी गप्पा मारत असताना कशावरून तरी हिरकणीची गोष्टीबद्दल चर्चा केली.. उशीर झाला होता, तिचं बाळ वाट बघतंय म्हणून तिला घरी पटकन जायचं होतं पण गडाचे सगळे दरवाजे बंद झाले होते.. तिने विनवणी केली पण दार उघडायला कोणी तयार नव्हते..  घरीतर पोहचायचे होते.. मग ती त्या अंधारात स्वतः एका कड्यावरून पायवाटेने गड उतरून पायथ्याशी गेली.. खाली  एकटी जाताना काळोख होता, वाट असुरक्षित होती आणि तिचे सगळे कपडे फाटले जात होते.. पण तिचं त्याकडे कुठेही लक्ष नव्हतं, तीव्र ओढीने तिची पावले पुढे पुढे जात होती.. तिला तिच्या बाळाला कधी भेटतेय असं होत होतं..
त्या शूर हिरकरणीचा पराक्रम दुसर्या दिवशी शिवरायांच्या कानावर पडला.. तेव्हा "तिने जीव धोक्यात घालून नसते धाडस का केले,तिला कोणी काही केले असते तर" असं म्हणून राजे तिला रागावले नाही.. तर उलट तिला बक्षीस दिले आणि त्या कड्याला हिराकर्णीचे नाव दिले.. घरच्या ओढीने  ती emotional  झाली आणि  तिने धोका पत्करला याचा अर्थ तिला काही कळत नाही असा नव्हता.. भावनाप्रधान असणं म्हणजे दुर्बल असणं असं मुळीच नाहीये..  उलट त्या प्रामाणिक शुद्ध भावनांमधून एक प्रकारची शक्ती मिळते आणि त्या शक्तीच्या सहाय्याने आपण कोणत्याही संकटाला खंबीरपणे तोंड देऊ शकतो.. जर ती खाली जाता येत नाही म्हणून केवळ रडत बसली असती आणि तिला एकटीला काहीतरी होईल या भीतीने तिथेच बसून राहिली असती तर मग तिला दुर्बल म्हणता आले असते.. आता यावर कोणी म्हणेल की तिने तिच्या बाळासाठी जीव धोक्यात टाकला.. तू मित्रमैत्रिणींसाठी इतकं काही करायची गरज नाही.. पण मला असे भेद करता येत नाही.. एकदा मैत्र जुळले की मग ते आपलेच असतातना..

so  called  practical  लोकांना माझ्यासारखी emotional  मुलगी आवडत नाही.. त्यांना कदाचित साहित्यही आवडत नसेल कारण कविता ,लेख यामधून  लिहिणाऱ्याचे विचार, मते आणि भावना प्रकट होत असतात..या पार्श्वभूमीवर माझंही मन emotional , sensitive  असलं तरी  दुर्बल नाहीये हे मला जाणवत.. बाकी लोक जे बोलायच ते बोलतातच..

नही समझे है वो हमे तो क्या जाता है..
हारी बाज़ी को जीतना हमे आता है..  :-)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: