बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

मंतरलेले दिवस - ४४

सकाळची वेळ.. नेहमीप्रमाणे ऑफिसच्या बस मध्ये खिडकीची जागा शोधून बसले.. पावसाळी वातावरण होते,हवेत गारवा जाणवत होता.. माझ्या पुढच्या सीटवर बसलेल्या मुलीने तिची खिडकी पूर्ण उघडी ठेवली  होती.. गाडी express way ला लागल्यावर जोरात वारा वाहू लागला.. मला थंडी वाजायला लागली म्हणून तिला खिडकी बंद करतेस का विचारायला मी उठले.. पण तेव्हा पाहिलं तर त्या वाऱ्याचा ती मनसोक्त आनंद लुटत होती.. तिचे केस छान उडत होते आणि ती त्या वातावरणात हरवून गेली होती.. अशात तिचा विरस करावा हे मला ठीक वाटले नाही.. म्हणून मी स्कार्फ लावून तशीच बसले.. प्रश्न थोड्या वेळाचा तर होता.. ऑफिस आले की दोघींना उतरायचेच होते.. तिचा वाऱ्याचा आनंद फार काळ टिकणार नव्हता आणि मला वाऱ्याचा होणारा त्रास सुधा कायम टिकणार नव्हता..

जीवन यात्रेत बरेचदा असेच अनुभव येतात ना.. एखाद्यासाठी जी सुखाची गोष्ट आहे ती दुसर्या कोणासाठी दुखकारक ठरू शकते.. आणि एखाद्याच्या दुखाची गोष्ट कोणालातरी आनंद देत असते.. सगळेच एका वेळेस सुखी होऊ शकत नाही बहुधा.. आणि प्रत्येकाची ही सुख - दुखं क्षणिक असतात..  पण कधीतरी  स्वतःचं दुखं बाजूला ठेवून दुसर्यांच्या सुखात सहभागी व्हायला जमलं  तर त्यातून मिळणारं समाधान मात्र चिरंतन असेल..

अपना तो क्या जिये मरे चाहे कुछ हो..
तुझको तो जीना रास आ गया..
जाने तू या जाने ना, माने तू या माने
ना..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: