बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ४१

विश्लेषण 

गेले काही दिवस माझ्या मनात खूप गोंधळ चालू होता.. मी रोज GM MAIL का पाठवते? नक्की कोणाकोणाला पाठवले पाहिजे?  त्यात काय अन कसं लिहिल पाहिजे?  त्यामुळे मेल करायची इच्छाच होत नव्हती.. विचारांती मला उत्तर मिळाली जी उत्तरे मिळाली ती मी इथे मांडत आहे..

दररोज मेल पाठवण्याचे कारण शोधत मी होते.. कधीपासून नक्की सुरुवात झाली आठवत नाही.. खूप विचार केल्यावर जाणवलं की आजकालच्या जमान्यात सगळेजन काही क्षणांसाठी एकत्र येतात आणि नंतर काही कारणांनी वेगळे होतात.. असे असले तरी जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी इंटरनेट माध्यमातून संवाद साधणं सोपं होतं.. माझ्या आयुष्यात अशा खूप काही खास व्यक्ती आल्या त्या काही न काही कारणाने दूर गेल्या आहेत.. रोज काही विशेष बोलण्यासारख असतच असा नाही पण रोज gm mail गेला की मला आणि त्यांना आम्ही जवळ असल्यासारखेच वाटतो.. म्हणून मेल बंद करणं माझ्याकडून ठरवून सुधा होत नाही..

आता प्रश्न कोणाकोणाला पाठवायचा.. जे जसे माझ्या आयुष्यात आले तशी यादी वाढत गेली.. त्यातले काहीजण वाचून आवर्जून उत्तर देतात, काहीजणांना वेळ नसतो पण ते वाचतात, काहीजण attitude  दाखवतात अन काहीजणांना आवडत नसल्याने कदाचित ते सरळ delete  मारत असणार.. जे चांगले लोक आहेत फक्त त्यांनाच मेल पाठवायचा ठरवल तर मग प्रश्न पडतो की  नक्की चांगले कोण? कारण आज अगदी जवळचे वाटणारे उद्या  रंग बदलतात किवा  भूतकाळात हरवून जातात,दुरावतात... आणि आज परके वाटणारे उद्या जवळ येतात.. आणि चांगला वाईट याचा हिशोब करणारी मी तरी कुठे perfect  आहे..  मी सुधा  कधी चांगली तर कधी वाईट वागते.. त्यामुळे एखाद्याला वाईट ठरवून त्यांच्याशी संपर्क तोडणं मला खरच जमत नाही.. आणि म्हणून  कोणी कसा वागल तरी सहसा मी स्वताहून संबंध तोडत नाही.. अर्थात त्यांनी स्पष्टपणे सांगितल कि तू मला मेल पाठवत जाऊ नकोस तर मी  नक्कीच त्याना मेल पाठवायचे बंद करेन ..

सगळ्यात महत्वाच म्हणजे मेल मधला मजकूर.. मी जे सुविचार , श्लोक पाठावते तसे वागता येते असे बिलकुल नाहीय. पण दिवसाची सुरूवात चांगल्या विचारणे करायला काय हरकत अहेना.. कधी कधी माझे लिखाण हळवे होते ते कहीना आवडत नाही..पण रोज जेवणात सगळेच गोड पदार्थ वाढलए तर जेवण रुचकर लागेल का?  मी बरोबर लिहिते का चुकीच ते माहिती नाही  पण प्रामाणिकपणे लिहिते,मन मोकळे करते हे नक्की.. मग कहीना ते आवडते, काहीजण ते आपल्या अनुभवांशी जोडतात.. काहीजन त्यांचे तसेच अनुभव आणि त्यातून शिकलेल्या गोष्टी मला सांगतात.. तसच कहीना माझ्या लिखणातुन माझा आत्मविश्वास कमी आहे आहे असे वाटते, कहीना अस मनातले सारे मांडणे बिलकुल आवडत नाही..  कहीना quotes आवडतात, काहींना  फक्त कविता आवडतात, कहीना मन्तरलेले दिवस लेख आवडतात, कहीना अध्यात्माबद्दल आवडते, कहीना फक्ता प्रेमाच्या गोष्टी आवडतात इत्यादी.. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर व्यक्ती सापेक्ष आहे.. शेवटी काय ते म्हणतातना 'व्यक्ती तितक्या प्रकृती'.. त्यामुळे मला ज सुचेल ते मी पाठवते.. पुढे ते आवडणे  - न आवडणे हा सर्वस्वी ज्याचा त्याच्या प्रश्न..


थोडक्यात..

मी लिहिलं  नाही तर..  कोणाला फरक पडतो?
मग मी का लिहावं?
मी लिहिलं तरी..  फरक कोणाला पडतो?
मग मी का लिहु नये??  :)


Finally we all are here temporary..  so live and let live is the best policy..   :)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: