सोमवार, १६ जानेवारी, २०१२

मंतरलेले दिवस - ५२

सुट्टीचा दिवस.. सह्याद्रीतली नसली तरी पुण्यातली भटकंती चालूच होती.. लाडक्या भाच्याला भेटायला गेले होते.. तिकडे जाताना नेहमीप्रमाणे सोबत भरपूर खाऊ आणि त्याच्यासाठी घेतलेल्या वस्तू होत्या.. त्याच्यासोबत मनसोक्त खेळून परत निघाले.. गाडीवर असताना मैत्रिणीचा फोन आला तो घेणे महत्वाचे होते म्हणून गाडी  बाजूला घेऊन थांबले.. फोनवर बोलता बोलता माझ लक्ष रस्त्याच्याकडेला गेले.. रस्ता खोदून काम चालू होते ही काही नवीन गोष्ट नव्हती.. पण उन्हात घाम गाळुन केबल टाकायचे काम करत असलेल्या लोकांमधे एक छोटा मुलगा त्याच्या आई वडिलंसोबत काम करताना दिसला..

आई वडील खोदकाम करत होते आणि त्या मुलाने केबल धरली होती.. माझं लक्ष गेलं कारण त्या बारक्याला त्याचे वडील कशावरून तरी रागावत होते.. एकतर त्याचे वय काय आणि त्यात उन्हाची वेळ.. या वयात इतर मुले खेळ खेळण्यात दंग असतात आणि हा बिचारा कष्टाचे काम करत होता.. ही विषमता मला नेहमीच अस्वस्थ करून टाकते.. आपल्याकडे लहान मुलांचे पालक किती लाड करतात.. मी मोठी होऊनही माझे आईबाबा मला किती जपतात... आणि  नुकतच मी तर भाच्याचे कौतुक करून आले होते..  त्याप्रमाणे या मुलाच्या आईवडिलांनाही तसंच काही वाटत असेल पण कदाचित परिस्थितीमुळे त्यांना मुलाला काम करायला लावण्यास भाग पडले असेल..

नुसता विचार करण्यात काही अर्थ नाही  म्हणून मी लगेचच गाडी मागे फिरवली.. कोपर्‍यावर दुकाने होती तिथे गेले.. खरंतर मला त्या छोट्यासाठी छान टोपी घ्यावी वाटली.. पण तिथे तसे दुकान नव्हते.. आणि लांब जाऊन टोपी घेऊन परत येईपर्यंत कोण जाणे हे लोकं कुठे असतील.. मग मोठा रुमाल विकत घेतला.. बिसकिट्स आणि चोकोलेट्स घेऊन पुन्हा त्याठिकाणी गेले.. द्यायचे कसे,सुरूवात कशी करावी ,त्यांना आवडेल का असं दिलेले,ते स्वीकार करतील का वगैरे मनात विचार चालू होते..

शेवटी थेट त्या मुलाजवळ गेले आणि नाव विचारले.. ते लोक मराठी नव्हते,त्याने काहीतरी नाव सांगितले ते मला कळले नाही.. मग मी त्याच्या हातात पिशवी दिली.. त्याने घेऊन त्यात काय काय आहे ते पहिले आणि त्याच्या चेहरयाची कळी एकदम खुलली.. त्याने लगेच त्याच्या आई वडिलांकडे पहिले.. ते सुधा अतिशय खुश झाले.. आणि त्या सर्वांचे हसरे चेहरे पाहून मला फार आनंद झाला जो मी शब्दात सांगू नाही शकत..

काही जणांना वाटते हिला काही जबाबादार्‍या नाही,भरपूर रिकामा वेळ असतो म्हणून असले करायला सुचते.. :) कदाचित असं  काही खास करण्यासाठी माझा जन्म असेल म्हणून देवाने मला बाकीच्या कशात अजुन अडकवले नसावे..  :) God knows..  देवाची लीला अगाध आहे..

रविवार, १५ जानेवारी, २०१२

मंतरलेले दिवस - ५१

मोठ्या बंगल्यामध्ये मालकाने पाळलेल्या मोतीकडे पाहून रस्त्यावरच्या टिपुला वाटले..
- किती नशिबवान आहे मोती.. ऐशोआरामात राहायचे.. मस्त मस्त पदार्थ खायचे.. सगळयांचे लाड करून घ्यायचे.. शिवाय मग मालकसोबत फिरायला जायचे.. आणि कोणी अनोळखी आले की जोरात भू भू करून मालकाला सांगायचे.. बास..

रस्त्यावर मुक्तपणे संचार करणार्‍या टिपुकडे पाहून बंगल्यातल्या मोतीला वाटले..
- आयुष्य असावं तर टिपुसारखं.. पाहिजे तेव्हा पाहिजे तिकडे भटकावं.. वाट्टेल ते शोधून खावं.. कुठे काही गडबड दिसल्यास पाठलाग करून पकडावं.. अजुन काय पाहिजे..

त्या दोघांकडे बघून मला वाटले..
- देवाने प्रत्येकाला काही जास्त आणि काही कमी दिले आहे.. परीक्षा तो सर्वांचीच घेत आहे तर.. संत तुकारामांनी म्हणले आहे..  "आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ।।"

ठरवलय आता मी..

ठरवलय आता मी मागे नाही पाहणार..
पुढे पुढे फक्त चालतच राहणार..

ठेच लागता पुन्हा नाही कुरवळणार
सावली मिळता फार नाही गुन्तणार
ठरवलय आता मी कुठे नाही थांबणार
पुढे पुढे फक्त चालतच राहणार..

उंची बघुनी कधीही नाही घाबरणार
खोली पाहुनी एकाकी नाही दचकणार
ठरवलय आता माझं कुठे नाही आडणार
पुढे पुढे फक्त चालतच राहणार..

कोमजलेल्या स्वप्नांना उगा नाही जपणार
धेयांच्या पंखांना कधी नाही मिटवणार
ठरवलय आता मी कुठे नाही हरणार
पुढे पुढे फक्त चालतच राहणार..

मंगळवार, १० जानेवारी, २०१२

सुदाम्याचे पोहे - ८

HSBC मध्ये भरत जोशी सरांच नाव ऐकलं नसेल असा कोणी सापडणार नाही.. त्यांच्या बद्दल मी बोलणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास..  IT मध्ये उच्च पदावर असलेले हुशार आणि उत्साही हे सर असणारे कायम नवीन नवीन उपक्रमात व्यस्त असतात..  नुकतच त्यांच ४०० वेळा सिंहगड चढून यायचं रेकॉर्ड झाले आहे.. त्या निमित्ताने हा लेख लिहीत आहे..  :)

पुर्वी HSBC मध्ये असताना मी सरांचे नाव ऐकून होते मात्र आमची चांगली ओळख हरिश्‍चंद्रगड ट्रेकच्या वेळेस झाली..  हा ट्रेक माझ्या सर्व ट्रेक्सपैकी सगळ्यात भारी ट्रेक.. सर SPM असूनही ट्रेकला पूर्णवेळ आमच्याशी मोकळेपणाने बोलत होते.. त्यांच्या वागण्यात कुठेच 'मी' अहंकार नव्हता.. ट्रेकला  आम्हाला लाजवेल असा सरांचा उत्साह आणि स्टॅमिना होता.. त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत गड कधी चढून आलो समजलेही नव्हते.. आणि पहाटे ३ वाजेपर्यंत थंडगार वार्‍यात  शेकोटी करून बसलेलो असताना त्यांनी सांगितलेल्या भुताच्या गोष्टी मला अजूनही ठळकपणे आठवतात.. :)

त्यानंतर HSBC मध्ये जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा ट्रेक्सच्या  गप्पा चालायच्या..  खास सांगायचे म्हणजे आम्हा ट्रेक ग्रुपला नेहमी दिवाळी किवा न्यू इयरला मेल्स शुभेच्छा देण्यासाठी सर स्वताहा मेल करायचे..  कायम व्यस्त असूनही ते वेळ काढून आमची आठवण ठेवून मेल करायचे याबद्दल आम्हाला फारच विशेष वाटायचे..

HSBC सोडताना मी सरांना भेटायला गेले होते पण तेव्हा ते बाहेर होते त्यामुळे भेट झाली नव्हती.. नंतर मेलवरून मधून आधून संपर्क व्हायचा.. मागच्या वर्षी एका मित्राचे लग्न होते तेव्हा आम्ही त्याच्यासाठी भेट म्हणून फोटोस- विडीओसचे पिपिटि बनवले होते तेव्हा सरांच्या उत्साहाची, मदत करण्याच्या स्वभावाची आणि इतके मोठे असून साधेपणाची मला खूप जवळून प्रचीती आली होती.. हे सर म्हणजे कोणी साधी व्यक्ती नव्हे हे तेव्हा मनोमनी पटले..

त्यादरम्यान कशामुळे तरी सरांना माझ्या ब्लॉगबद्दल समजले तेव्हा त्यानी छान अभिप्राय दिला.. त्यांनी लिहिले की माझ्या कविता ते आणि मॅडम (त्यांच्या पत्नी) दोघेही वाचतात आणि त्यांना आवडतात हे ऐकल्यावर मी भारावून गेले होते.. नंतर मग मी माझ्या मेलिंग लिस्ट मध्ये त्यांचे नाव घातले.. अजूनही सर आणि मॅडम वेळ काढून मेल वाचतात आणि मध्येअध्ये उत्तर देतात तेव्हा मला खूप आनंद मिळतो..

कैलास मानसला जायचे ठरल्यावर त्यांना हे सांगायला मी फोन केला होता तेव्हा ते भारताच्या बाहेर होते.. खरतर ते असच सांगू शकले असते की ते भारताबाहेर असल्याने फोन नाही घेतला.. पण ते भरत जोशी सर होते.. फोन कट करून स्वतः त्यांनी फोन केला आणि विचारपूस केली.. आणि कैलास मानस वरुन आल्यावर सरांनी आणि मॅडमने मला त्यांच्या घरी खास जेवायला बोलावले.. मला आठवतय त्यावेळेस सर कायम बाहेर असायचे.. पण तरीही वेळ काढून त्यांनी आवर्जून घरी बोलावले होते.. सर इतके मोठे असूनही त्यांच्या घरी खूप साधेपणाने बोलले.. त्यांची मुलेही खूप हुशार आहेत आणि तरीही एकदम नम्रपणे बोलताना जाणवत होते.. मॅडमने माझ्यासाठी अगदी पूर्ण स्वयपाक केला होता हे पाहून तर मी फरच भावनावश झाले..    कैलास मानस वरुन आले म्हणून माझ्या कुठल्याही मित्रमैत्रिणिने इतके कौतुक केले  नसेल तेव्हढे सरांच्या कुटुंबीयांनी केले.. मॅडमने माझ्या कवितांचे खूप  कौतुक केले की मला मनातून लाज वाटली की खरच इतक्या कौतुकस पात्र आहेत का त्या कविता.. नव्हे तर त्या सर्वांचे मन खूप मोठे आहे हेच खरे.. माणसाचा मोठेपणा त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीतून दिसत असतो,त्यासाठी कोणतेही मोठे पराक्रम करावे लागत नाहीना.. :)

इतकं सगळं सविस्तरपणे सांगायचे कारण की काही लोकं काही नसताना उगाच माज करतात.. थोडं काही मिळवलं की काहीजणांची वागणूक बदलते.. कितीतरी लोक बारीकसारीक गोष्टींवरून  दुसर्याना कमी  सिद्ध करून स्वतः बढाया मारतात.. आणि वेळ नाही हे कारण सर्रास सांगून बरेचजण फार मोठे असल्याचा देखावा करतात.. किती उदाहरणे आहेत अशी माझ्या डोळ्यासमोर.. मात्र हे सर कर्तुत्वाने आणि प्रसिद्धीने मोठे असूनही  सर्वांशी खूप साधेपणाने मोकळेपणाने बोलतात याचे मला फार आश्चर्य वाटते.. जगात  अशा व्यक्ती खूप कमी आहेत.. 'ground to earth' याचा अर्थ मला सरांकडून नीट कळला.. उंच उंच भरारी घेऊनही पाय जमिनीवर ठेवायचे ही सरांची शिकवण माझ्या कायम लक्षात राहील..  Thank you Sir! :)

गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

मंतरलेले दिवस - ५० :)

A memorable event in Infosys.. :)

त्या दिवशी अर्चना म्हणाली तिला आणि नम्रताला माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे.. मी विचार करत होते की त्याना माझ्याकडे काय काम असेल बरे.. चहाला भेटलो तेव्हा नम्रता म्हणाली की वर्षाखेरानिमित्त आपण इन्फी मध्ये झाडपुसायचे काम करतात आणि बागेत दिवसभर जे राबतात त्यांना आपण पार्टी देऊया..  अर्चना म्हणाली की तू असं कहीना काही करत असतेस म्हणून तुला विचारला.. झालं मग चर्चा सुरू झाल्या..

मला ही कल्पना भयंकर आवडली.. नेहमीच जाणवतं की हे लोकं दिवसभर स्वच्छता, बागकाम् अविरतपणे करत असतात.. आपण मधे आधे किती टाइमपास करतो,चहाला जातो, गप्पा मारत बसतो.. पण हा स्टाफ मात्र पहावं तेव्हा कामच करत असतो.. आपल्यापेक्षा फार पटीने हे कष्ट करतात आणि पैसे मात्र आपण जास्त कमावतो.. शिवाय हे सगळे वयाने मोठे असूनही आपल्याशी फार आदराने बोलतात आणि गरज पडेल तेव्हा मदतीसाठी कायम हजर असतात.. मला आठवतय एकदा सकाळी अचानक खूप जोरात पाऊस सुरू झाला.. बस पासून बिल्डींग मध्ये जाईपर्यंत सगळे भिजत होते तेव्हा हाउसकीपिंग स्टाफ पैकी काहीजण प्रत्येकला पळत जाऊन छत्र्या देत होते. . असं करताना ते स्वताहा भिजत होते पण त्याना त्यांच्या तब्येतीची पर्वा नव्हती. . जरी पत वेगळी असली तर तेही माणसचना..


कार्यक्रमाचा आराखडा केला.. अजुन तिघी मुली आमच्या कटात सामील झाल्या..  फेज१ मधे साधारण १०० लोकं होते त्याप्रमाणे बजेट ठरवले.. फक्त आमच्या अकाउंट मधून पैसे गोळा करायचे ठरवले..  DM, HR ची परवानगी घेतली..  सगळ्याना मेल्स पाठवण्यात आले.. आमच्या पैकी प्रत्येकीनी एकेक फ्लोरची जबबदारी घेतली..  मेल गेल्यावर माझ्या टीम मधल्या लगेचच दोघांनी पैसे आणून दिले तेव्हा फार बरं वाटलं. कारण लोकांच्या प्रतिक्रिया काय असेल याची शंका होती.. आम्ही सगळ्याजणी आनंदाने एकमेकीना सांगू लागलो माझ्याकडे इतके इतके जमले म्हणून.. पैसे किती द्यायचे हे आम्ही देणर्यावर सोपवले होते.. प्रत्येकाने २०रुपये दिले तरी पुष्कळ होईल असा आमचा अंदाज होता.. अर्थातच आम्ही सहा जणी जास्तीत जास्त वर्गणी देणार होतो..

थोड्या लोकांनी दिल्यावर मात्र माझ्या इथे शांतता झाली.. बर्‍याच जणांना बराच काही करायचं असतं पण त्यासाठी जरा मागे लगावं लागतं असं मला नेहमीच अनुभव येतो.. मग काय रोज वेगवेगळे प्रेरणा देणारे सुविचार पाठवून सर्वाना एकदा आठवण करून द्यायची.. ते वाचून काहीजण पैसे द्यायला स्वतहुन येऊ लागले.. संगण्याजोगी एक गोष्ट की  टीम मधल्या १०० लोकांपैकी काहीजण कधी जास्त बोलत नाही असे लोकं वर्गणी आवर्जून द्यायला आले..  :)  इतर टीमनेही भरघोस प्रतिसाद दिला.. पुरेसे पैसे जमा झाले..

२८ डिसेंबर तारीख निश्चित केली.. डॉमीनोज पिझा आमच्या बिल्डिंगमध्ये खाली असल्याने तिथे ऑर्डर दिली.. बाकी केक शीतापेय बाहेरून मागवले.. खरतर मी गेले काही दिवस एकाच वेळेस बर्‍याच उद्योगात व्यस्त असल्याने पैसे गोळा करून दिल्यावर ऑर्डर देण्याच्या कामात माझी मदत झाली नाही त्यामुळे मला जरा अपराधी वाटत होते.. पण नंतर ती कसर भरून निघाली..

गेले बरेच दिवस वाट बघत होतो ती संध्याकाळ आली.. ११० जणांना एकदम बोलवलं  तर बसायला जागा मिळणार नाही म्हणून त्यांच्या सुपरवयजर सरांनी तीन गट केले.. ४ वाजता पहिल्या गटातले लोकं जमू लागले.. प्रत्येकाच्या चेहर्यवर उत्सुकता होती.. त्या सर्वाना आम्ही कुठेना कुठे पहिले होते त्यामुळे आम्हाला ते ओळखीचे वाटत होते..  खरतर आम्ही केक कापून पिझा वगैरे खायला द्यायचे ईतकेच ठरवले होते.. पण कार्यक्रम थोडा अनौपचरिकपणे व्हावा, सर्वा स्टाफ ने मोकळेपणाने सहभागी व्हावे म्हणून बाकीच्या जणांनी मला त्यांच्याशी बोलायला सांगितले कारण मराठीत संभाषण करणे महत्वाचे होते..

सग्लेजन जमल्यावर मी प्रथम  आपण कशासाठी जमलो आहोत हे सांगितले.. "तुम्हाला २४ तास काम करताना आम्ही नेहमीच पाहतो.. आमच्यापेक्षा जास्ती काम तुम्ही अगदी मनापासून करता याची सर्वाना जाणीव आहे.. "  असे मी म्हणल्यावर त्यांचे सुपरवयजार सर अक्षरशहा रडू लागले.. जे घडले ते लिहीत आहे,काहीही अतिशयोक्ती नाही.. आपल्या हाताखाली काम करणार्‍या लोकांसाठी डोळ्यात पाणी आलेले लीडर मी पहिल्यांदाच बघितले.. ते पाहून आम्ही भारावून गेलो.. नंतर मग मी प्रत्येकाला ओळख करून द्यायला सांगितले आणि आम्हीही आमची ओळख सांगितली.. ते सर्वजण ईन्फिमधे बरीच वर्ष काम करत आहेत हे समजले.. नंतर त्यांना त्यांचे अनुभव, मते सांगण्याची विनंती केली.. दोघातिघे त्यांच्या सारंबद्दल आणि इनफोसीस बद्दल फार कृतदनेंने बोलले.. सरांनी आम्हाला घडवलं असे प्रत्येकाचे म्हणणे होते.. शिवाय इन्फी मधे आम्हा प्रत्येकाला सन्मानाची वागणूक मिळते जी बाकी इतर ठिकाणी विशेष मिळत नाही,घरच्यासारखे वातावरणा आहे असं सगळा ऐकून माझा इन्फि बद्दलचा अभिमान दुणावाला..

नंतर ग्रूप फोटो काढले,त्यांनी फार एन्जॉय केले.. केक कपताना  ,पिझा खाताना प्रत्येकजण मनापासून सारे खूप खुशीत होते.. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन निरोप घेतला.. जाताना ते आम्हा सर्वांचे आभार मनात होते  तेव्हा आमचेहि डोळे भरून आले..  या उपक्रमासाठी ज्यानी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केली यांचे आम्ही मनातून आभार मानले...  अशा प्रकारे तीन ग्रूप येऊन गेले, सगळं व्यवस्थित पार पाडलं आणि आम्ही निश्चिंत झालो.. एक वेगळेच समाधान आम्हाला लाभले..  :))

They say..
Life laughs at u when u r unhappy..
Life smiles at u when u r happy..
But life SALUTES u when u make others happy..

गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

मनातल्या मनात..

मनातल्या मनात..
किती फुले उमलतात..
किती वेली पसरतात..
किती गंध दरवरळतात..
मनातल्या मनात..

मनातल्या मनात..
किती वादळे उठतात..
किती जहाजे बुडतात..
किती पूल तुटतात..
मनातल्या मनात..

मनातल्या मनात..
किती प्रश्न पडतात..
किती तर्क लागतात..
किती उत्तरे मिळतात..
मनातल्या मनात..

सोमवार, १२ डिसेंबर, २०११

मन..

जेव्हा मी माझे सुखं दाखविले,
तेव्हा ते म्हणले खोटं आहे..

जेव्हा मी माझे दुखं दाखविले,
तेव्हा ते म्हणले छोटं आहे..

जेव्हा मी माझे मन दाखविले,
तेव्हा मात्र ते म्हणले मोठं आहे!!!